राज्याचा बारावीचा निकाल 91.88 टक्के
नाशिक: प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाइन जाहीर करण्यात आला असून, राज्याचा निकाल 91.88 टक्के लागला. कोकण विभागाचा निकाल राज्यात सर्वात जास्त ९६.७४ टक्के लागला. तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला आहे.तसेच पुनर्परीक्षेचा निकाल ३७.६५ टक्के आणि दिव्यांगाना सवलतीचे गुण देण्यात आले आहेत.
११ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत परीक्षा पार पडली. राज्यभरातून १५ लाख विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यात ८,१०,३४८ मुले आणि ६,९४,६५२ मुलींचा समावेश होता. यावर्षी मुलींच्या उतीर्ण होण्याचे प्रमाण ९४.५८ टक्के तर मुलांच ८९.५१ टक्के आहे. राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण १४,२७,०८५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,१७,९६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १३,०२,८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.८८ टक्के आहे. विद्यार्थ्यांना आज महाविद्यालयात गुणपत्रिका देण्यात येणार आहे.
चौंडीच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या कायद्याला मंजुरी अहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या…
सर्वोच्च न्यायालय ः चार आठवड्यांत अधिसूचना निघणार नवी दिल्ली ः राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका…
नाशिक : प्रतिनिधी दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने मंगळवारी (दि. 6) जिल्ह्याला झोडपलेे. ऐन…
नवी दिल्ली ः जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावानंतर भारताचा जुना मित्र असलेला रशिया भारताच्या…
सरावादरम्यान सायरन वाजणार, ब्लॅकआउट होणार मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यातला तणाव कमालीचा…
सटाणा : प्रतिनिधी साक्री-शिर्डी महामार्गावर सटाणा शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या यशवंतनगर जवळ दुभाजकावर भल्या…