राज्याचा बारावीचा निकाल 91.88 टक्के
नाशिक: प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाइन जाहीर करण्यात आला असून, राज्याचा निकाल 91.88 टक्के लागला. कोकण विभागाचा निकाल राज्यात सर्वात जास्त ९६.७४ टक्के लागला. तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला आहे.तसेच पुनर्परीक्षेचा निकाल ३७.६५ टक्के आणि दिव्यांगाना सवलतीचे गुण देण्यात आले आहेत.
११ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत परीक्षा पार पडली. राज्यभरातून १५ लाख विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यात ८,१०,३४८ मुले आणि ६,९४,६५२ मुलींचा समावेश होता. यावर्षी मुलींच्या उतीर्ण होण्याचे प्रमाण ९४.५८ टक्के तर मुलांच ८९.५१ टक्के आहे. राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण १४,२७,०८५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,१७,९६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १३,०२,८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.८८ टक्के आहे. विद्यार्थ्यांना आज महाविद्यालयात गुणपत्रिका देण्यात येणार आहे.
आ. देवयानी फरांदे यांची लक्षवेधी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेत ठेकेदारीवर नियुक्त करण्यात येणार्या कर्मचार्यांच्या…
आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवीमुक्त दिन नाशिक ः प्रतिनिधी दोन वर्षांनी सिंहस्थ पर्वणी येत आहे. त्यानिमित्ताने नाशिक…
नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. सततच्या पावसामुळे भाजीपाला…
दोन संस्थांना प्रशासनाधिकारी डॉ. चौधरींच्या नोटिसा नाशिक : प्रतिनिधी मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्या पोषण…
मनपाच्या तिजोरीत पडणार साडेबारा कोटींची भर, नोंद नसलेल्या मालमत्तांचा शहरात शोध नाशिक : प्रतिनिधी महापालिकेच्या…
सामान्य माणसाने आयुर्वेदाच्या दृष्टीने पावसाळा म्हणजे थोडा आनंद, आणि भरपूर आजारपणाची भीती. पावसाळ्यात वातावरणात ओलावा…