सिन्नर : प्रतिनिधी
नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात बुधवारी (दि. 31) सकाळी तीन वाहनांच्या झालेल्या भीषण अपघातात आयटी अभियंता, भाजीपाला व्यवसाय करणार्या नाशिक येथील व्यापार्यासह तिघांचा मृत्यू झाला. भरधाव व विरुद्ध दिशेने आलेल्या कंटेनरने पिकअप व दुचाकीला धडक दिल्याने हा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला.
बाळासाहेब बाजीराव व्यापारी
आयटी अभियंत्याचा दुर्दैवी मृत्यू
निर्मळ पिंपरी (ता. राहाता) येथील रहिवासी असलेला अवधूत निर्मळ (वय 23) मुंबई येथे एका खाजगी कंपनीत आयटी अभियंता म्हणून नुकताच रुजू झाला होता. सुट्टी घेऊन तो बुधवारी सकाळी मुंबई येथून नाशिकला उतरला. तिथून तो नातेवाइकांच्या पिकअपमध्ये बसून घरी निघाला असता, त्याच्यावर रस्त्यातच काळाने घाला घातला.
या भीषण अपघातात बाळासाहेब बाजीराव व्यापारी (वय 42, ह.रा. महाले फार्म, सिडको, नाशिक), अवधूत रामनाथ निर्मळ (23, रा. पिंप्री निर्मळ, ता. राहाता, जि. अहिल्यानगर) आणि दुचाकीस्वार असे तिघे जागीच ठार झाले. मृत दुचाकीस्वाराची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते.
मूळचे केलवड (ता. राहाता) येथील रहिवासी बाळासाहेब बाजीराव व्यापारी सकाळी साडेनऊच्या सुमारास भाजीपाला खरेदीसाठी महिंद्रा पिकअप (एमएच 15- जीव्ही 7149) घेऊन सिन्नरमार्गे राहात्याकडे निघाले
होते.
त्यांच्यासोबत नातेवाईक अवधूत रामनाथ निर्मळ (वय 23, रा. पिंप्री निर्मळ, ता. राहाता, जि. अहिल्यानगर) हाही त्यांच्यासोबत गावी निघाला होता. सकाळी सुमारे सव्वादहाच्या सुमारास मोहदरी घाटात सिन्नरकडून नाशिकच्या दिशेने भरधाव वेगात आलेल्या टाटा कंटेनरवरील (एमएच. 46 एआर. 2725) चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो दुभाजक ओलांडून नाशिक बाजू कडून येणार्या लेनवर पलटी झाला. याच दरम्यान नाशिककडून सिन्नर कडे येणार्या पिकअप वाहनाला कंटेनरने जोरदार धडक दिली. याच वेळी नाशिक कडून सिन्नर कडे येणारी दुचाकी (एमएच. 15 सीबी. 6796) देखील कंटेनरच्या तडाख्यात सापडली. अपघातानंतर कंटेनर व पिकअप दोन्ही वाहने पलटी झाली, तर दुचाकीस्वार कंटेनरखाली दबला गेला. घटनेची माहिती मिळताच पोलीस व नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. गंभीर जखमींना सिन्नर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी बाळासाहेब व्यापारी, अवधूत निर्मळ व दुचाकीस्वार शाजी फर्नांडो ( वय 50 रा. उपनगर, नाशिक) यांना मयत घोषित केले.
या घटनेमुळे व्यापारी आणि निर्मळ कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कंटेनर चालक अपघाताची खबर न देता घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती असून पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मोहदरी घाटातील वाढते अपघात, जड वाहतुकीचा बेदरकार वेग आणि चुकीच्या दिशेने होणारी वाहतूक यामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत असून तातडीने कडक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
Three killed in container collision at Mohdari Ghat
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…