नाशिक

काटवण परिसरात वादळी वाऱ्याने धांदल

रामपूरा येथे पोल्ट्री फार्म जमीनदोस्त
मालेगाव:प्रतिनिधी
मालेगाव तालुक्यातील काटवन परिसरात दुपारच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांची मोठी धांधळ उडवली. ठिकठिकाणी झांडांच्या फांद्या तुटून पडल्यामुळे शेतशिवारातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला आहे.दुपारी बारा वाजेनंतर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामध्ये पावसाचे प्रमाण कमी असले तरी सोसाट्याच्या वाऱ्याने साध्या स्वरूपात तयार केलेल्या कांदाचाळी, तसेच बाहेर झाकलेला कांदा थोड्याफार प्रमाणात ओला झाला आहे.
काटवण परिसरात मान्सूनपूर्व मेघगर्जनेसह पाऊस व वादळी वाऱ्यामुळे येथील भटू मोतीराम खैरनार यांचा पाच हजार पक्षांचा पोल्ट्री सेड दुपारी साडेबाराच्या सुमारास जमीनदोस्त झाला यामुळे सदर शेतक-याचे पंधरा लाखांहून अधिकचे नुकसान झाले असून तातडीने तलाठी गोविंद तिडके घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.
काटवन परिसरातील रामपुरा येथील युवा शेतकरी भटू मोतीराम खैरनार हे (गट क्रमांक ४६) मध्ये वडिलोपार्जित असलेल्या कोरडवाहू पाच एकर क्षेत्रात कुक्कुट पालन करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत आहेत. याच पोल्ट्रीच्या एका बाजूस कुटुंबासहित त्यांनी संसार थाटला आहे. रविवार (ता.४) दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक धडकलेल्या मेघगर्जनेसह जोरदार वादळाने मात्र होत्याचे नव्हते केले. पाच हजार पक्षांचा पोल्ट्री सेड वादळात अलगद उडाल्याने श्री. खैरनार यांचा संसार उघडय़ावर आला लाखों रूपयांचे नुकसान झाले.
तसेच वरीष्ठ कार्यालयात याबाबत अहवाल सादर करण्यात येईल असे सांगितले. कजवाडे येथील ग्रामपंचायत सदस्य अमृत सोनवणे, सागर भामरे, नामदेव शिरसाट यादव सोनवणे, अनिल शिरसाट, बापू खैरणार, ज्ञानेश्वर शिरसाठ आदिंनी भेट देऊन खैरनार कुटुंबियांचे सांत्वन केले व प्रशासनाने सदर कुटुंबियाला तातडीने भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.
पाच हजार पक्षी जगविताना कसरत
दरम्यान शनिवार (ता.३) रोजी नुकतेच पाच हजार पक्षी पोल्ट्रीत टाकले होते. या वादळात उडून गेलेल्या शेडमुळे कोवळ्या पक्षांचा जीव जातांना श्री. खैरनार कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते. कजवाडे येथील ग्रामपंचायत सदस्य व शेतीशिवारातील शेतकऱ्यांनी वरीष्ठ कार्यालयात याबाबत माहिती दिली असता तलाठी गोविंद मारूती तिडके यांनी भेट देऊन पंचनामा केला व पंधरा लाखांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
.

 

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

2 hours ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

2 hours ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

2 hours ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

2 hours ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

3 hours ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

3 hours ago