मनोरंजन

ट्रॅजेडी क्वीन ” मीनाकुमारी “..

३१ मार्च …
याच दिवशी ५० वर्षांपूर्वी या अभिनेत्रीने आपला अखेरचा श्वास घेत या जगाचा निरोप मुंबई येथे सेंट एलिझाबेथ हॉस्पिटल मध्ये घेतला . ते साल होते १९७२ . उणेपुरे ३९ वर्षाचे आयुष्य या अभिनेत्रीला लाभले .तिचा जन्म १ ऑगस्ट १९३३ रोजी मुंबई येथे झाला अभिनय, गायक व कवी अशा विविध क्षेत्रात तिचे कमाली चे प्रभुत्व होते. ” नाझ ” या टोपण नावाने तिला ओळखले जाते. तिला भारतीय सिनेमाचे ” सिंड्रेला ” असेही म्हटले जाते. तिचे खरे नाव होते महजबी बानो. तिच्या जन्माच्या वेळी तिचे वडील अलिबख्श व आई इकबाल बेगम यांचे कडे डॉक्टरांना देण्यासाठी पैसे सुद्धा नव्हते. अशा गरीब परिस्थितीत मीनाकुमारी चे बालपण गेले.

वयाच्या सहाव्या वर्षीच तिने सिनेमा सृष्टीत प्रदार्पण केले . अनेक शोकाकुल व शोकात्मक अशा भूमिकेमुळे तिला ” ट्रॅजेडी क्वीन ” असेही म्हटले जाते . एकूण ३३ वर्षे तिने सिनेमा सृष्टीवर अधिराज्य गाजविले . कमल अमरोही बरोबर तिचे वैवाहिक आयुष्य जेमतेम १० वर्ष एवढेच होते . मीनाकुमारीने एकूण ९४ सिनेमा मध्ये अभिनेत्री म्हणून काम केले .या पैकी साहेब बीबी और गुलाम, पाकिझा , आरती, बैजू बावरा , प्रणिता, दिल आपण और प्रीत पराई फूट पाथ . काजल इत्यादी सिनेमांचा समावेश होतो .बैजू बावरा या १९५२ साली रिलीज झालेल्या चित्रपटाने मीनाकुमारीची प्रसिद्धी साऱ्या भारतभर झाली . तसेच पाकिझा या १९७२ साली रिलीज झालेल्या सिनेमाने तिला तिच्या मृत्यू नंतर प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली . चित्रपट क्षेत्रातील एक सौंदर्यवती अभिनेत्री मधुबाला ही मीनाकुमारीची अतिशय आवडती होती . सिनेक्षेत्रातील एका अग्रगण्य सिने दिग्दर्शक सत्यजित रे यांनी मीनाकुमारी बद्दल अतिशय गौरवोद्गार काढले आहेत . त्यांच्या मते मीनाकुमारीची अभिनयातील क्षमता उच्च कोटीची होती . गुलझार सारखा कवी म्हणतो ” मीनाकुमारी म्हणजे साक्षात कविताच होती.”

मीनाकुमारी एवढा लोकप्रिय कलाकार होणे दुर्मिळ आहे . कमल अमरोही बरोबर तिचा १९६४ साली घटस्फोट झाला . मीनाकुमारी अखेरीस निराशेच्या खाईत गेली . या निराशेपोटी डॉक्टरांनी तिला ब्रँडीचा डोस औषध म्हणून देण्यास सुरवात केली . त्याचे तिला व्यसनच लागले . तिला शेवटी लिव्हर सिरासीस झाला त्यातच तिने ३१ मार्च १९७२ रोजी या जगाचा निरोप घेतला . जिवंत पणीच आख्यायिका बनलेल्या मीनाकुमारीच्या आयुष्याची अद्भुत कहाणी पुढे लोक वाचताच राहतील मीनाकुमारी आयुषयभर खरे प्रेम शोधत राहिली पण त्याचा शोध मात्र तिच्या मृत्यू नंतरचा थांबला . मीनाकुमारीला एकूण १९५४, १९५५ १९६३ व १९६६ अशा चार वर्षे फिल्मफेअर अवार्ड मिळाले होते . भारत सरकारने या अभिनेत्रींच्या स्मरणार्थ २०११ साली पोस्टाचे तिकीट काढले होते मीना कुमारने आपल्या कबरीवर खाली ल शब्द लिहण्याची विनंती केली होती.

 

” वो अपनी जिंदगी को
एक अधुरे साज
एक अधुरे गीत … एक तुटे दिल
परंतु बिना किसी अफसोस
के साथ समाप्त हो गयी “

==
शांताराम वाघ पुणे

Team Gavkari

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

53 minutes ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

1 hour ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

1 hour ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

1 hour ago

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…

2 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

2 hours ago