महाराष्ट्र

अभिनेत्री डॉ.जुई जवादे यांचे ‘२६ नोव्हेंबर’ चित्रपटातून पदार्पण

भारतीय संविधानाची सखोल माहिती देणारा अनिल कुमार जवादे आणि  ओंकार निर्मित सचिन उराडे लिखित आणि दिग्दर्शित ‘२६ नोव्हेंबर’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे.या चित्रपटात डॉ.जुई जवादे ही नवोदित अभिनेत्री पदार्पण करत आहे. शरद पवार डेंटल कॉलेज, सावंगी येथून डॉ.जुई यांनी बीडीएस केलं असून व्हीएसपीएम डेंटल कॉलेज, नागपूर येथे इंटरशीप केले आहे. त्यानंतर त्यांनी दोन अनुभवी दंतचिकित्सकांच्या क्लिनिकमध्ये वर्षभर प्रॅक्टिस केली आहे. “Wizards of Waverly Place”, “Hannah Montana” सारखे डिस्ने शो लहानपणी बघायला त्यांना आवडायचे. त्यातूनच अभिनय, डान्स, गाणी याने डॉ. जुई यांच्या मनावर खोल परिणाम केला. रोज आरशासमोर सगळं बघून त्या अभिनयाची तालीम करायला लागल्या. या दरम्यान त्यांना ‘नैना’ नावाचं स्क्रिप्ट मिळालं.त्यात नकारात्मक भूमिका होती म्हणून त्यांनी आधी या चित्रपटाला नकार दिला कारण त्यावेळी त्यांच्यात आत्मविश्वास नव्हता. पण कुटुंबाने समजावलं “एकदा तरी प्रयत्न कर!” मग त्यांनी छोटासा सराव सुरू केला, आणि डायरेक्ट कॅमेऱ्यासमोर अभिनय  सुरू केला.तेथूनच त्यांचा अभिनय प्रवास सुरु झाला.त्यानंतर त्यांना ‘२६ नोव्हेंबर’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारायला मिळाली.
  डॉ.जुई यांनी अगोदर “The Legit Talks” हा टॉक शो २०२१ पासून केला आहे.त्यांचे “The Legit” हे मॅगझिन देखील कार्यरत आहे. तसेच हेल्थ आणि फिटनेस ट्रेनर  म्हणून त्या गेल्या ४ वर्षांपासून कार्यरत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून त्या तरुणांना टॉक शो च्या माध्यमातून योग्य संधी शोधून देण्याचं मार्गदर्शन करत आहेत. अनिल कुमार जवादे आणि निलेश ओंकार निर्मित सचिन उराडे लिखित आणि दिग्दर्शित ‘२६ नोव्हेंबर’ हा घटनात्मक हक्कांची जाणीव करून देणारा महत्त्वाचा चित्रपट आहे.केवळ चित्रपट नसून,ही एक चळवळ आहे. या चित्रपटात डॉ.जुई यांच्यासोबत अनिकेत विश्वासराव, सयाजी शिंदे, विजय पाटकर, गणेश यादव, मुश्ताक खान, भारत गणेशपुरे, किशोर चौगुले, डॉ. विलास उजवणे आणि अंजली उजवणे यांसारखे प्रतिभावान कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांना केवळ भावनिक करणार नाही, तर त्यांना त्यांच्या हक्कांसाठी लढण्याची नवी प्रेरणा देईल,असे दिसते.या चित्रपटात डॉ.जुई यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. संविधान दिन १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीप्रमाणे मोठ्या प्रमाणावर साजरा व्हावा, हाच उद्देश घेऊन निर्मिती झालेला हा सिनेमा नागरिकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी उभा राहिलेला एक प्रेरणादायी आवाज आहे.येत्या मे मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
Editorial Team

Recent Posts

अधिक मासातील अधिक विचार

‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…

23 minutes ago

मरण स्वस्त आणि जगणं महाग

अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्‍यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…

42 minutes ago

खरंच!.. काय होते ते दिवस….

बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…

49 minutes ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात रिक्षाचालकांची मुजोरी

पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…

58 minutes ago

जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र

109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…

1 hour ago

अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका

1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…

1 hour ago