नाशिकरोड : प्रतिनिधी केंद्र सरकारने लष्कर भरतीसाठी जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेविरोधात देशात काही ठिकाणी युवकांकडून विरोध होत आहे . रेल रोको केला जात आहे . त्यामुळे आज दुसऱ्या दिवशीही रेल्वे वेळापत्रकावर परिणाम झाला . काही गाड्या रद्द करण्यात आल्या . तर काही विलंबाने धावत असल्याचे रेल्वेने सांगितले . बिहारवरून येणारी पाटलीपुत्र , पटणा वास्को , पवन या तीन गाड्या रविवारी रद्द करण्यात आल्या . मुंबईहून बिहारला जाणारी भागलपूर , पवन , जनता एक्स्प्रेस , स्पेशल हॉलिडे या रद्द करण्यात आल्या . बिहारवरून येणारी महानगरी एक्स्प्रेस चार तास , गोदान तीन तास उशिराने धावली . काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले . नाशिक रोडमार्गे मुंबईला जाणाऱ्या आणि मुंबईहून उत्तर भारतात सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांना आंदोलनाचा फटक प्रामुख्याने बसत आहे . बिहारमधील पाटलीपुत्र भागलपूर येथून मुंबईला रवाना होणाऱ्या प्रवासी रेल्वेगाड्या उत्तर भारतातील आंदोलनामुळे काल रद्द करण्यात आल्या होत्या . अग्निपथ योजनेच्या विरोधात आंदोलन असेच सुरू राहिले तर रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून पडू शकते . गैरसमजातून सुरू झालेले हे आंदोलन आणखीन किती काळ सुरू राहणार हे स्पष्ट होत नसल्यामुळे रेल्वे वेळापत्रकाबाबतही अनिश्चितता आहे . आणि
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…