अतिथीगृहातील सामानाची चोरी; सुरक्षा यंत्रणा वार्यावर
नाशिक : प्रतिनिधी
कसमादेसह उत्तर महाराष्ट्राचे वैभव असलेला वसाका सध्या शेवटच्या घटका मोजत असल्याचे चित्र आहे. पंधरा वर्षांपूर्वी या कारखान्याच्या माध्यमातून हजारो शेतकरी, कामगार, वाहतूक ठेकेदार यांच्या उदरनिर्वाहाचे साधन होते. सध्या ‘वसाका’ची प्रचंड दुरवस्था झाली आहे.
दीड- दोन वर्षांपूर्वी कारखान्यासह वीज प्रकल्पाच्या महाकाय ट्रान्स्फॉर्मरमधून हजारो लिटर ऑइल चोरी करून गुन्हेगार पसार झाले. चोरीचे धागेदोरे कळवणपर्यंत गेले होते, तरी पोलिसांना चोरांना पकडण्यात यश आले नाही. मधल्या काळात मुख्य कारखान्यात प्रवेश करून पश्चिम बाजूला असलेल्या दगडी भिंतीला मोठं भगदाड पाडून आत प्रवेश केला. लाखो रुपये किमतीचा इलेक्ट्रिक मोटारी, पितळी तसेच लोखंडी व्हॉल्व्हसह ट्रॅक्टर ट्रॉली गिरणा नदीकिनारी आढळून आले होते. कोट्यवधी रुपयांचे मूल्य असलेले किमती सामान कारखान्यात होते. दुर्दैवाने दोन वर्षांनंतर तेथे काय शिल्लक राहिले, हे सांगणे कठीण आहे. सध्या दोन तीन नर-मादी बिबट्याचा मुक्त संचार आहे. त्यामुळे काहीकाळ चोर्या आटोक्यात आल्या होत्या. दोन-तीन दिवसांपूर्वीही कारखान्याच्या उत्तर बाजूस असलेल्या वातानुकूलित अथितीगृहामागे असलेल्या शेतकरी निवासातील खोल्यांची कुलपे तोडून तेथील किमती फर्निचर व गाद्या व इतर सामान लुटून नेल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत कारखान्याच्या रोजंदारीवर कामावर असलेल्या सुरक्षा कर्मचार्यांनी विठेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते कुबेर जाधव यांच्या कानावर हा प्रकार टाकला. त्यांनी तत्काळ कारखान्याच्या कार्यस्थळावर जाऊन पाहणी केली. त्यांच्यासोबत सुरक्षा कर्मचारी, विशाल निकम, दिनेश ठाकरे, युनियन सदस्य शशिकांत पवार, दीपक पवार, रणधीर पगार उपस्थित होते.
जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…
कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…
गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…
मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…
410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…
मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…