वटपौर्णिमा हा हिंदू धर्मातील विवाहित महिलांसाठी अत्यंत भावपूर्ण आणि महत्त्वाचा सण आहे. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या निरोगी, दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी मनोभावे वटवृक्षाची पूजा करतात. हा सण केवळ धार्मिक विधी नसून, वैवाहिक जीवनातील प्रेम, विश्वास, निष्ठा आणि एकमेकांवरील समर्पण यांचे सुंदर प्रतीक आहे.
यंदा 29 जून रोजी वटपौर्णिमा हा सण साजरा होतो आहे.वटपौर्णिमा हा हिंदू विवाहित महिलांचा एक प्रमुख सण आहे. ज्येष्ठ पौर्णिमेला हे व्रत केले जाते. यामध्ये वडाच्या झाडाची पूजा करून प्रदक्षिणा घातल्या जातात. या व्रताचा उगम सावित्री आणि सत्यवानाच्या कथेवरून झाल्याचे सांगितले जाते. सावित्रीने आपल्या पातिव्रत्याच्या आणि दृढनिश्चयाच्या जोरावर यमराजाकडून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले होते. वडाचे झाड दीर्घायुष्य आणि अखंड समृद्धीचे प्रतीक मानले जाते, म्हणून या वृक्षाची पूजा केली जाते. वटपौर्णिमा…सौभाग्य… पती-पत्नीतील प्रेम… निष्ठा आणि समर्पणाचा दिवस मानला जातो. या दिवशी शुभमुहूर्तावर वडाच्या झाडाची पूजा केली जाते.
वैवाहिक नात्यातील विश्वास, परस्पर आदर, संयम आणि अखंड साथ यांचे महत्त्व जपणे होय. सावित्रीने आपल्या बुद्धिमत्ता, धैर्य आणि दृढ निश्चयाच्या बळावर यमराज यांच्याकडून सत्यवानाचे प्राण परत मिळवले. वडाचे झाड दीर्घायुष्य, स्थैर्य आणि अखंड जीवनाचे प्रतीक मानले जाते. म्हणून महिलांकडून वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून दोरा बांधला जातो आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांचे कुटुंब आणि समाजातील स्थान हे मानाचे आणि सशक्त असे आहे. तिला जगतजननी म्हटले आहे आणि तिलाच दुष्टांचा संहार करणारी काली माताही म्हटले आहे. हे लक्षात घेऊन आजच्या काळातही महिलांनी आपले हे सामर्थ्य आणि संस्कार टिकवून सामाजिक संतुलन राखण्यास तत्पर असले पाहिजे. – राजू जाधव
Vat Purnima: A day that highlights the honored status of women.
Mangesh Shirole, the spirited Deputy Mayor striving for the development of Igatpuri.
- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…
Simhastha: Not merely a celebration of faith, but a blueprint for Nashik's future.
The Sacred Vessel of Spirituality: The Holy Site of Nashik