नाशिक

लासलगाव येथे लव्ह जिहाद विरोधी विराट मुकमोर्चा

 

 

लासलगाव : समीर पठाण

लव्ह जिहाद,धर्मांतर बंदी कायदा राज्यासह देशभरात लागू करण्यात यावा,श्रद्धा वालेकर या हिंदू भगिणीचा मारेकरी आफताब पूनावला या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी,गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी त्याच प्रमाणे सकल हिंदू धर्माचे आराध्य दैवत भगवान श्री शिवछत्रपती महाराज यांचा अवमान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तिवर,संघटनेवर,राजकीय पक्षावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी यांसह विविध मागण्यांसाठी लासलगाव मधील विविध हिंदू संघटनांच्या वतीने महंत जनेश्र्वर महाराज भारत माता आश्रम बोकडदरे,निशा पाटील भिरूडे,साक्षी भांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातून शनिवारी भव्य मूक मोर्चा काढण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराज चौकात या मागण्यांचे निवेदन लासलगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांना सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आले

विश्व हिंदू परिषद,बजरंग दल,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सनातन संस्था लासलगाव,बाबा अमरनाथ सोशल ग्रुप, सकल हिंदू समाजाच्यावतीने शहरातील बाबा अमरनाथ मंदिर एस टी डेपो येथून शनिवारी सकाळी अकरा वाजता मूक मोर्चास प्रारंभ झाला.यावेळी विविध राजकीय पक्ष,संघटना मोर्चात सहभागी झाले होते.मोर्चात महिला व युवतींचा लक्षणीय संख्येने सहभाग होता.विविध मागण्यांचे फलक घेऊन मोर्चेकरी भगवे ध्वज,भगव्या टोप्या आणि गळ्यात मफलर परिधान करून सहभागी झाले होते.

धर्मांतर बंदी कायदा राज्यासह देशभरात लागू करण्यात यावा.श्रद्धा वालकर या हिंदू भगिनीचा मारेकरी आफताब पुनावाला या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी, गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी,छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणार्‍या प्रत्येक व्यक्तीवर,संघटनेवर,राजकीय पक्षावर कारवाई करण्यात यावी अशा मागण्या मूक मोर्चाद्वारे करण्यात आल्या.छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामूहिक राष्ट्रगीतानंतर या मोर्चाचा समारोप करण्यात आला

या वेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लासलगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

1 hour ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

1 hour ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

1 hour ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

2 hours ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

2 hours ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

2 hours ago