दुपारपासूनच फेरीला सुरुवात; ब्रह्मगिरीवर भक्तांची गर्दी
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर येथे श्रावणाच्या
तिसर्या सोमवारच्या ब्रह्मगिरी
प्रदक्षिणेसाठी भाविक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. रविवार (दि. 10) दुपारपासून भक्तांचा ओघ सुरू झाला असून, येथे बसस्थानकावरून थेट
कुशावर्तावर येऊन लागलीच
फेरीला जाणारे भाविक होते.
शनिवारी रात्री आलेले भाविक रविवारी सकाळपासून ब्रह्मगिरी पर्वतावर गोदावरीच्या उगमस्थानी दर्शनासाठी जात होते. सकाळी आठ वाजेला बह्मगिरीवर गेलेले भाविक परत येतांना भातखळा धर्मशाळेपासून मधल्या मार्गाने गंगाद्वार येथे येऊन गोरक्षनाथ
गुंफेत दर्शन घेऊन नंतर त्र्यंबकेश्वर शहरात सायंकाळच्या सुमारास येताना दिसत होते. बह्मगिरी पर्वतावर जाणारे आणि येणारे भाविक यांची एकच दाटी झाल्याने भाविकांना एकाच जागेवर थांबवले जात होते. त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांच्या मार्गदर्शनाने येथे वन विभागाने कर्म चारी तैनात केले होते. रविवारी दुपारी दोन वजेच्या सुमारास खंबाळा वाहनतळ सुरू करण्यात आले.
पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, उपअधीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी बंदोबस्त तैनात केला आहे. तळेगाव फाटा, अंबोली व पहिने येथे खासगी वाहने वळवण्यात येवून ती वाहतळावर लावली गेली आणि भाविक प्रवाशांना एसटी बसने त्र्यंबकेश्वर येथे सोडण्यात येत होते. दुपारी 4 वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. त्यावेळी कुशावर्तासह सर्वत्र रेनकोट घातलेले भाविक दिसून येत होते. कुशावर्तावर गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्र्यंबक नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी व मुख्याधिकारी डॉ. श्रीया देवचके यांनी सर्व विभागांची आढावा बैठक घेऊन शहरातील सुविधांबाबत सूचना दिल्या आहेत. दोन दिवसांपासून मुख्याधिकारी डॉ. श्रीया देवचके, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या अधिकारी पूर्वा माळी, शहर अभियंता स्वप्नील काकड यांसह सर्व अधिकारी व कर्मचारी येथे तळ ठोकून आहेत. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पवार, डॉ. प्रशांत पाटील आणि सर्व वैद्यकीय अधिकारी, तसेच पंचात समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोतीलाल पाटील यांनी प्रदक्षिणा मार्गावर, तसेच शहरात वैद्यकीय पथकांचे नियोजन केले आहे. सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…
वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…