महाराष्ट्र

नाशिक विभागात अबतक 154

महसूल, पोलीस खात्यात सर्वाधिक लाचखोर
नाशिक  ः देवयानी सोनार
सरकारी कामासाठी अधिकार्‍यांकडून सामान्य माणसांची नेहमीच पिळवणूक होत असते. त्यातून मग काम करुन घेण्यासाठी अधिकारी, कर्मचारी चिरीमिरीची अपेक्षा करतात. नागरिकही काम वेळेत होण्यासाठी पैसे देण्यास तयार होतात. मात्र, अनेकजण लाच लुचपत विभागाकडे तक्रारी करतात. त्यातून हे लाचखोर जाळ्यात सापडतात. नाशिक विभागात गेल्या वर्षभरात 154 सापळे यशस्वी झाले. विशेष म्हणजे या लाचखोरांमध्ये जिल्हा निबंधकांपासून तर शिक्षणाधिकारी पर्यंतच्या अधिकार्‍यांचा सहभाग आढळून आला.

त्र्यंबकला बेल वन उद्यानासाठी मिळेना जागा!

सरकारी काम आणि सहा महिने थांब ही म्हण खरोखरच नागरिकांना अनुभवण्यास येते.  कायदेशीर काम करवून घेण्यासाठीची यंत्रणा चिरीमिरीसह मोठमोठे घबाड मिळविण्यात माहिर झाल्याचेच चित्र आकडेवारीहून दिसून येत आहे.वर्ग एक ते वर्ग चारचे अधिकारी कर्मचार्‍यांनाही वरकमाईचा मोह आवरत नाही .जिथे न्यायदानाचे कामकाज चालते अशा जिल्हा न्यायालय ठिकाणीही वर्ग तीन,चार आणि कनिष्टांनाही चिरीमिरीशिवाय त्यांचे पान हलत नसल्याचे चित्र आहे.

 

लासलगावी पुन्हा कांद्याचे लिलाव बंद

 

नाशिकला  59 , अहमदनगर 33,धुळे 18,नंदूरबार 14,जळगाव30 असे एकूण 154 लाचखोर आढळून आले. नाशिक विभागात महसूल खाते 10 त्याखालोखाल पोलीस विभाग, जिल्हा परिषद 7, भुमि अभिलेख 5, सहकार 5  आदी विविध विभागांत कारवाई करण्यात आली.

 

भुरट्या चोरांचा शेतमजुरांच्या स्मार्टफोनवरच डल्ला

यामध्ये वर्ग तीनचे सर्वाधिक लाचखोर तर वर्ग 1,2 आणि इतर खासगी व्यक्तींचा नंबर लागतो.सर्वाधिक वर्ग3 चे 120 लाचखोर पकडण्यात आले.

 

मुंबई बॉम्ब स्फोटातील संशयितासोबत बडगुजरांचे फोटो व्हायरल

महसूल विभाग,जिल्हा न्यायालय परिसर,पोलिस,जि.प.,पंचायत समिती,भुमि अभिलेख,महानगरपालिका,आरोग्य विभाग,शिक्षण विभाग  आदींसह विविध 45 विभाग तसेच इतर आणि खासगी असे 47 प्रकारच्या विभागातील अधिकारी कर्मचार्‍यांद्वारे लाच घेण्याच्या तक्रारी वाढत आहेत.
वर्षभरात 125 लाचखोर जाळ्यात सापडले होते. पोलिस खात्यातील लाचखोर सर्वाधिक होते.  यंदा लाचखोरीच्या बाबतील महसून विभाग अव्वल ठरला आहे. पोलिस विभाग त्याखालोखाल असून जिल्हा परिषद,भूमि अभिलेख आदी विभागातील अधिकारी कर्मचारी सापळ्यात अडकल्याचे चित्र आहे

 

व्हायलेन्स.. व्हायलेन्स.. व्हायलेन्स..!

 

लाचखोरांची कोटीच्या कोटी उड्डाणे
विभागात लाचखोरांना पकडल्यानंतर त्यांच्या मालमत्तेची घराची तपासणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आली.या तपासणीत अनेक लाचखोरांकडे मोठी माया मिळून आली. लाचखोरांनी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतलेली आढळून आले. ही अपसंपदा जमा करण्यात येते

 

नाशिकमध्ये धनगर समाज विद्यार्थ्यांसाठी राज्यातील पहिले वसतिगृह

 

वर्ग तीनचे सर्वाधिक लाचखोर
लाचखोरांमध्ये वर्ग एक आणि वर्ग दोन पेक्षा वर्ग तीनचे कर्मचारी अधिक प्रमाणात लाच घेत असल्याचे आकडेवारीवरून सिद्ध होते. नाशिक विभागात वर्ग एकचे सहा, वर्ग दोनचे  12, वर्ग तीनचे 48 तर वर्ग चारचे अवघे पाच जण लाच घेताना आढळून आले. त्यात वर्ग तीनचेच सर्वाधिक लाचखोर असल्याचे सिद्ध होते.

वर्षभरात घरगुती हिंसेच्या तब्बल 856 तक्रारी !

 

खासगी व्यक्तींचाही वापर
लाचखोरीसाठी अधिकारी व कर्मचार्‍यांबरोबरच काहीजण खासगी व्यक्तींचाही वापर करुन घेताना दिसून येतात. 2 डिसेंबरपर्यंत एकूण 13 खासगी व्यक्तींना लाच घेताना पकडण्यात आले.अनेक अधिकारी व कर्मचारी लाच मागीतल्यानंतर ती स्वीकारण्यासाठी मध्यस्थ खासगी व्यक्तीचा उपयोग करुन घेतात. नाशिक विभागात गेल्या वर्षभरात 13 जणांना पथकाने पकडले.

महिला पर्यटन उद्योजिका साठी एमटीडीसी चे धोरण

महसूल विभाग अव्वल
लाचखोरीमध्ये महसूल विभागच सर्वाधिक भ्रष्टाचारी असल्याचे उघड झाले आहेत. त्याखालोखाल पोलीस खात्याचा क्रमांक लागतो. महसूल विभागात तलाठी, मंडल अधिकारी हे लाच घेताना पकडण्यात आले. असे दहा जण लाच घेताना जाळ्यात अडकले. तर पोलीस खात्यात आठ जणांना पकडण्यात आले आहे.

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

अधिक मासातील अधिक विचार

‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…

23 minutes ago

मरण स्वस्त आणि जगणं महाग

अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्‍यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…

42 minutes ago

खरंच!.. काय होते ते दिवस….

बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…

48 minutes ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात रिक्षाचालकांची मुजोरी

पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…

58 minutes ago

जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र

109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…

1 hour ago

अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका

1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…

1 hour ago