नाशिक

जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र

109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी

नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक गंभीर बनत चालली असून, प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 109 गावे आणि 238 वाड्यांना सध्या 118 खासगी टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. या टँकरच्या दररोज 256 फेर्‍या होत असून, सुमारे दोन लाख 574 नागरिकांना दिलासा मिळत आहे.
जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, येवला तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाई जाणवत आहे. येथे 36 गावे आणि 47 वाड्यांसाठी 33 टँकरच्या 55 फेर्‍या सुरू आहेत. मालेगाव तालुक्यात 16 गावे व 48 वाड्यांना 16 टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. इगतपुरी, सिन्नर, नांदगाव, देवळा, चांदवड, सुरगाणा व पेठ तालुक्यांतही टंचाईची तीव्रता वाढली आहे.
बहुतांश भागांत 24 हजार लिटर क्षमतेच्या टँकरचा वापर करण्यात येत असून, काही ठिकाणी दहा हजार व 12 हजार लिटर क्षमतेचे टँकरही कार्यरत आहेत. प्रशासनाने गावांसाठी पाच आणि टँकरसाठी 47 विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. आवश्यकतेनुसार आणखी टँकर वाढविण्याची तयारी सुरू आहे.
दरम्यान, बागलाण, नाशिक, कळवण आणि निफाड तालुक्यांत सध्या टँकरची आवश्यकता नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आगामी काळात पावसाला उशीर झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गेल्या वर्षी सुरू होते 143 टँकर
गेल्या वर्षी मे महिन्यात 143 टँकरद्वारे जिल्ह्यात पाणीपुरवठा करण्यात येत होता. यंदा 118 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, यंदा टँकरची संख्या कमी असली, तरी उन्हाची दाहकता अधिक असल्याने येत्या काही दिवसांत टँकरच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पाणी जपून वापरण्याचे आवाहन
उन्हाची दाहकता आणि यंदा पावसाला विलंब होण्याचा अंदाज लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन केले आहे.

Water shortage is severe in the district.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अधिक मासातील अधिक विचार

‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…

12 minutes ago

मरण स्वस्त आणि जगणं महाग

अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्‍यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…

31 minutes ago

खरंच!.. काय होते ते दिवस….

बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…

38 minutes ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात रिक्षाचालकांची मुजोरी

पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…

47 minutes ago

अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका

1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…

1 hour ago

नॉन क्रिमीलेअर मर्यादा पंधरा लाख

ओबीसी उपसमितीच्या बैठकीत निर्णय, 43 नव्या जातींच्या समावेशाचा प्रस्ताव मुंबई : राज्यातील ओबीसी समुदायासाठी एक…

2 hours ago