राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस : माता मृत्यू घटल्याचा दावा
नाशिक ः देवयानी सोनार
बाळंतपण म्हणजे स्त्रीचा नवा जन्मच. प्रसूत कळा अनेकदा असह्य होऊन अचानक वाढणारा रक्तदाब,ऍनिमिया,रक्तस्त्राव आदी गोष्टींमुळे प्रसूतकाळात माता मृत्यू होतात. गेल्या तीन वर्षांत 240 महिलांचा प्रसुतीदरम्यान मृत्यू झाला आहे.
अनेकदा प्रसुतीपूर्व नंतर योग्य ती काळजी न घेतल्याने मृत्यू झाले आहेत मातामृत्यू घटविण्यासाठी जिल्हा आरोग्य रुग्णालयातर्ङ्गे विविध योजना राबविल्या जातात. तालुक्याच्या मुख्यालयात सिझेरियन सुविधा सुरू आहे.तसेच लक्ष कार्यक्रम अंतर्गत सन्मानपूर्व मातृत्व सेवा विषयक प्रशिक्षण पूर्ण करण्यात आल्याचे जिल्हा आरेाग्य रुग्णालयाचे डॉ.अनंत पवार यांनी सांगितले.
दरवर्षी प्रसूती दरम्यान हजारो मातांचा मृत्यू होतो. याला अनेक घटक कारणीभूत असतात. जसे की, गर्भारपणात महिलेची योग्य काळजी न घेणं, व्यवस्थित पोषण न झाल्यास, महिला अशक्त बनते, अशा महिलेची प्रसूती करण्यात अनेक धोके असतात. प्रसंगी महिलेचा जीव देखील जाऊ शकतो. मुल जन्माला आल्यानंतर देखील संबंधित महिलेची आणि बाळाची विशेष काळजी घ्यावी लागते. मुलांचे पोषण व्यवस्थिीत झाले नाही तर बालके कुपोषित होतात.
गर्भारपणात आहार आरोग्याच्या तक्रारी तसेच व्यायाम शारीरिक हालचाल,मानसिक स्थिती याकडे वेळीच लक्ष न दिल्याने प्रसुतीदरम्यान उच्च रक्तदाब तसेच हृदयाशी संबधीत आजारांमुळे मृत्यूचा धोका वाढतो.
जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये सुरक्षित मातृत्व सेवा दिल्या जातात, तालुक्याच्या मुख्यालयात सिझेरियन सुविधा सुरू आहेत. तसेच लक्ष्य कार्यक्रमातर्ंगत सन्मान पूर्व मातृत्व सेवा विषयक प्रशिक्षण पूर्ण करण्यात आलेलं असून त्यामुळे माता मृत्यू दर कमी झालेला आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या रेफरल ऑडिटमुळे प्रसूती मातांना संदर्भित करण्याच्या प्रमाणात लक्षणीय सुधारणा झालेली आहे.
डॉ. अनंत पवार
जिल्हा आरोग्य रुग्णालय नाशिक
जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…
कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…
गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…
मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…
410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…
मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…