समृद्धी महामार्गावर अपघात; चार ठार
सिन्नर प्रतिनिधी
राज्यात सर्वात मोठा महामार्ग असलेल्या समृद्धी महामार्गावर नेहमीच अपघाताची मालिका सुरु असून आता पुन्ह्या एकदा मुंबईहून समृद्धी महामार्गाने शिर्डीला परतत असताना भरधाव कार दुभाजकाला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार झाले आहेत दि ११ रविवारी रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास सिन्नरच्या हद्दीत ही घटना घडली.
सिन्नरजवळील खंबाळे शिवारात झालेल्या या भीषण अपघातात शिर्डी येथील चौघेजण ठार झाले आहेत. त्यात तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. हज यात्रेकरूंना सोडून हे सर्वजण शिर्डीला परतत होते. अपघातात चौघेजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरू आहेत. सिन्नर हद्दीतील हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गावर खंबाळे शिवारात घोटी बाजूकडून शिर्डी बाजूकडे जाणारी अति वेगात असलेल्या इन्होवा कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या संरक्षण भिंतीवर जावून आदळली. या अपघातात रज्जाक अहमद शेख (वय ५५), सत्तार शेखलाल शेख (वय ६५), सुलताना सत्तार शेख (वय ५०) हे जागीच ठार झाले. तर, फैयाज दगुभाई शेख (वय ४०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जुबेर रज्जाक शेख (वय ३५), मैरूनिसा रज्जाक शेख (वय ४५), अझर बालन शेख (वय २५) मुस्कान अजहर शेख (वय २२) हे गंभीर जखमी झाले. यातील काही जखमी शिर्डी येथील सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल तर काही नाशिक येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहेत. मयत आणि जखमी सर्व शिर्डी येथील रहिवासी असून एकमेकांचे नातलग आहेत.
पोलिस उपअधीक्षक प्रदीप मौराळे यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग पोलिस सिन्नर केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत गिरी, महाराष्ट्र सुरक्षा पथक, जलद प्रतिसाद पथक समृध्दी महामार्ग यांनी जलद घटनास्थळी जात इनोव्हा कारचे दरवाजे कटरने कापून मयत आणि जखमींना कारमधून बाहेर काढले. मयतांना सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात तर जखमींना तातडीने रुग्णवाहिकेच्या साह्याने उपचारासाठी रवाना करण्यात आले. अपघात ग्रस्त वाहन घटनास्थळावरून हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…