चिंचविहिर येथे दोन सोळा वर्षीय मुलींचा पाण्यात पडून मृत्यू तर एक जखमी
नांदगांव प्रतिनिधी
तालुक्यातील चिंचविहीर तांडा येथील दोन सोळा वर्षीय मुलींचा चिंचवीर तांडा येथे असलेल्या के टी बंधाऱ्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवार दिनांक ८ रोजी घडली
पूजा अशोक जाधव (वय १६ ) वर्ष तिची मैत्रीण खुशी देवा भालेकर ( १६ ) तसेच कावेरी देवा भालेकर ( १८ ) या तिघी कपडे धुण्यासाठी चिंचवीहीर तांड्याजवळ असलेल्या केटी बंधाऱ्यावर गेलेल्या असताना त्यांचा बंधाऱ्यातील पाण्यात पाय घसरून पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यांना औषध उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय नांदगाव येथे दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ राठोड यांनी पूजा अशोक जाधव ( १६ ) तसेच खुशी देवा भालेकर (वय १६ ) चिंचविहिर तांडा यांची तपासणी केली असता त्यांना मृत घोषित केले या घटनेची आकस्मित मृत्यूची नोंद नांदगाव पोलिसात दाखल करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय वाघमारे हे करत आहेत तर कावेरी देवा भालेकर वय ( वर्ष १८ ) हिला पुढील औषध उपचारा कामी मालेगाव येथे हॉस्पिटल मध्ये पाठवण्यात आले आहे
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…