नाशिक

मास्क वापराबाबत निर्णय घ्यावा राज्य सरकारला सूचना – डॉ.भारती पवार

 

 

केंद्र सरकारच्यावतीने संपूर्ण आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचा इशारा

 

 

नाशिक –

करोनाचा उद्रेक देशात पुन्हा एकदा होईल,अशी शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्यावतीने संपूर्ण आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.महाराष्ट्र राज्यात करोनाचे रूग्ण वाढत असल्याने चिंता वाढतआहे.त्यामुळे ठिकठिकाणी आढावा घेण्यात येत आहे. राज्य सरकारने मास्क वापराबाबत निर्णय घ्यावा अशा सूचना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी दिली.

नाशिक जिल्हयात सध्या 90 च्या वर करोना बाधित रुग्णांची संख्या आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी मंगळवारी (दि.4) जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून आढावा घेतला. करोनाचा नवा विषाणू आहे का? याबाबत सर्वेक्षण करण्याचे आवाहन केंद्र सरकारच्यावतीने करण्यात आल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.गर्दीच्या ठिकाणी शक्यतो जाणे टाळा, याशिवाय जर गेलाच तर त्या ठिकाणी जाताना मास्क लावून जावे अशा स्वरूपाचे आवाहन डॉ. पवार यांनी करत मास्कबाबत संपूर्ण निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला असल्याचेही स्पष्ट केले.

देशभरात करोना रुग्ण वाढत असताना राज्यातही करोना रूग्ण वाढत आहे. राज्यातील इतिहास पाहता मुंबई आणि मालेगाव या ठिकाणी करोनाचं हॉटस्पॉट असल्याचे पाहायला मिळाले होते. विलक्षण पद्धतीने करोनाचे रुग्ण वाढल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली होती. पुन्हा एकदा तशी परिस्थिती निर्माण होऊ नये,यासाठीच खबरदारीचा उपाय योजना राबविण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला देण्यात आल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.        90 च्या वर करोना बाधित रुग्ण

 

जिल्हयात करोनाची सद्यस्थिती पाहता 90 च्या वर करोना बाधित रुग्ण असल्याने आणि बहुतांश करोना चाचणीचे अहवाल प्रलंबित असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून औषधांचा साठा, करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची संख्या, लसीकरण आणि बेडची व्यवस्था याबाबतचा आढावा डॉ. भारती पवार यांनी घेतला.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

20 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

20 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

20 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

21 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

21 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

21 hours ago