बुलढाणा:
राज्यातील मोठं देवस्थान असलेल्या शेगाव संस्थानने 2001 साली तत्कालीन विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांच्या संकल्पनेतून सरकारकडून जमीन लिझवर घेऊन त्यावर अतिशय भव्य धार्मिक, अध्यात्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून आनंद सागर या पर्यटन आणि धार्मिक केंद्राची साडे तीनशे एकरवर उभारणी केली होती. अल्पावधीतच ‘आनंद सागर’मुळे शेगाव हे जगाच्या नकाशावर येऊन याठिकाणी मोठ्या प्रमाणात धार्मिक पर्यटन वाढलं होतं. पण मध्यंतरी काही कारणामुळे शेगाव संस्थानानं आनंद सागर बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता ‘आनंद सागर’मधील फक्त आध्यात्मिक केंद्र आजपासून सुरू होणार आहे.फक्त त्यातील मंदिरं आणि इतर सुविधा यांचाच लाभ आता भक्तांना मिळणार आहे. हे अध्यात्मिक केंद्र आजपासून सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत निःशुल्क सुरू होत आहे.