आरोग्य

जिर्‍याचे पाणी पिण्याचे फायदे

जिरापाणी हे काही सामान्य पाणी नाही हे एक प्रकारचे औषधी आहे. यामुळे आरोग्याला अनेक लाभ मिळतात. जिरापाणी बहुतेक वेळा वजन कमी करण्यासाठी वापरले जाते. त्याच सोबत याचे अनेक आरोग्य विषयक फायदे आहेत. प्रत्येक घरामध्ये स्वयंपाक घरामध्ये जिरे वापरतात. जिरे टाकून केलेले पदार्थ जास्त स्वादिष्ट बनतात. यामुळे पाचनतंत्र सुधारण्यास मदत मिळते.
जीरे सुगंधी असते आणि याची चव देखील वेगळीच असते. जिरे पाणी पिण्यामुळे वजन कमी होते बद्धकोष्ठता जीर्‍याचे पाणी पोटाच्या संबंधित कोणतेही आजार दूर करण्यासाठी मदत करतात. सकाळी उठल्यानंतर एक ग्लास जीरा पाणी पिण्यामुळे अपचन आणि पोटाच्या
संबंधित आजारामध्ये आराम मिळतो. असे मानले जाते कि जीरा आपल्या पाचन तंत्राला बुस्ट करतो. आणि पचन संबंधित समस्या दूर करतो.

वजन कमी करतो जीर्‍यामध्ये असलेल्या एंटीऑक्सीडेंट आणि पोषक तत्व चयापचय वाढवते. जीरा आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी बाहेर काढते. ज्यामुळे शरीरातून चरबी कमी होते.हार्ट अटैकचा धोका कमी करतो जीरा पाणी शरीरातील फैट आणि कोलेस्ट्रोल कमी करण्यास मदत करतो. कोलेस्ट्रोलची कमी हार्ट अटैकचा धोका कमी करण्यास मदत होते. मासपेशीच्या वेदना पासून आराम जीरा पाणी शरीरातील रक्त संचार वाढवतो. यामुळे मासपेशीच्या वेदना कमी होतात. आणि शरीर थकण्या पासून वाचवतो.इम्यूनिटी सिस्टम मजबूत करतो रोग प्रतिकारकशक्ती मजबूत असेल तरच आजारा पासून बचाव होतो.

जिर्‍याच्या पाण्यामध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असते. आयर्न आपली रोग प्रतिकारकशक्ती मजबूत करते. याच सोबत जीर्‍यामध्ये विटामिन ए आणि सी असते. यामुळे इम्युनिटी लेवल वाढते.एनीमिया दूर करण्यास मदत करते रक्ताची कमी एनिमिया रोग असतो. याचा उपाय जीर्‍याच्या पाण्याने केला जाऊ शकतो. जीर्‍यामध्ये आयरन भरपूर असते ज्यामुळे हिमोग्लोबिन संतुलित ठेवण्यास मदत होते. यामुळे एनिमियाची समस्या देखील दूर होऊ शकते. जर शरीरामध्ये रक्ताची कमी असेल तर नियमितपणे जीर्‍याचे पाणी सेवन करावे. झोपेची समस्या दूर करतो झोपेची समस्या वजन वाढल्यामुळे होते. वजन वाढल्यावर झोपेची समस्या होणे सामान्य आहे. जर तुम्हाला झोप न येण्याची समस्या होत असेल तर जीर्‍याचे पाणी सेवन केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो

 

हे ही वाचा :

Devyani Sonar

Recent Posts

छगन भुजबळ यांनी घेतले काळाराम मंदिरात दर्शन*

*छगन भुजबळ यांनी घेतले काळाराम मंदिरात दर्शन* नाशिक: प्रतिनिधी श्रीराम नवमीच्या निमित्ताने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री…

18 hours ago

संडे अँकर: कर्जमाफी देऊ नका आणि जखमेवर मीठही चोळू नका

कर्जमाफी देऊ नका आणि जखमेवर मीठही चोळू नका महायुतीतील भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस…

18 hours ago

अखेर कृषिमंत्री कोकाटे यांनी मागितली शेतकऱ्यांची माफी

नाशिक: प्रतिनिधी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्री…

19 hours ago

पंचवटीतील पोलिसावर निलंबनाची कारवाई

अंमली पदार्थ विकणार्‍यांशी कनेक्शन उघड सिडको : विशेष प्रतिनिधी नाशिक पोलीस दलात मोठा घोटाळा उघडकीस…

1 day ago

अभिनेते मनोजकुमार यांचे निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास

मुंबई: शोर, क्रांती, रोटी कपडा और मकान यासारख्या एकसे बढकर एक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा…

3 days ago

गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन

गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन नाशिक : प्रतिनिधी गोदावरीचे…

4 days ago