विधवांच्या सामाजिक सन्मानाचा महिला धोरणात अंतर्भाव करणार

– ॲड. यशोमती ठाकूर
समाजातील विधवा महिलांना त्यांच्या पतीच्या निधनानंतर अपमानास्पद वागणूक दिली जाते. मुख्य म्हणजे तिच्या शरीरावर असलेले सौभाग्य लेणे म्हणजे बांगड्या मंगळसूत्र आणि कपाळावरील कुंकू काढून घेतले जाते, या अपमानास्पद अनिष्ट प्रथे विरोधात हेरवाडच्या ग्रामपंचायतीने केलेला ठराव हा स्तुत्य आहे. हा ठराव राज्याच्या महिला धोरणात कसा अंतर्भाव करता येईल आणि राज्यातील सर्व विधवा महिलांना कशी सन्मानजनक वागणूक मिळेल, यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री ठाकूर यांनी दिली. हेरवाडच्या ग्रामपंचायत सदस्यांनी ॲड. ठाकूर यांची आज मुंबई येथे भेट घेतली या भेटीनंतर त्या बोलत होत्या.
कोल्हापूर जिल्ह्यातील सदस्यांनी अतिशय महत्त्वाचा आणि पुरोगामीत्वाचा दाखला देणारा ठराव केला आहे. ग्रामसभेने ठराव करून गावातील विधवा महिलांना यापुढे सन्मानाची वागणूक मिळण्यासाठी त्यांच्या अंगावरील मंगळसूत्र बांगड्या आणि कपाळावरील कुंकू न पुसण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे. या निर्णयाचे महाराष्ट्र राज्यात विविध स्तरावर कौतुक आणि स्वागत होत आहे. या निर्णयाचे रूपांतर कायद्यात करता येईल का? अशी विनंती करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांनी आज राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळेही आवर्जून उपस्थित होत्या. यावेळी बोलताना एडवोकेट ठाकूर म्हणाल्या की, “हा अतिशय चांगला निर्णय असून तो राज्यभर कसा अमलात आणता येईल, यासाठी लवकरच येणाऱ्या राज्याच्या महिला धोरणात त्याचा अंतर्भाव केल्यास सर्वांच्या अंगवळणी पडेल आणि त्याचा खूप चांगला परिणाम दिसेल. त्यामुळे येणाऱ्या महिला धोरणात त्याचा कसा अंतर्भाव करता येईल, यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन ॲड. ठाकूर यांनी यावेळी दिले.
हे ही वाचा :
Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

अशांत बलुचिस्तान

पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…

5 hours ago

राजकीय संवेदनशीलता

- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…

5 hours ago

अंतराळ कचर्‍याचे वाढते संकट : पृथ्वीच्या भवितव्याला नवे आव्हान

एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…

6 hours ago

दिलासा!

प्रशांत महासागरात अल निनो सक्रिय असल्याने देशात यंदा कमी पाऊस पडण्याचा अंदाज असताना जून महिना…

6 hours ago

संततधार पावसाने नंदिनी नदीला पूर

सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…

6 hours ago

पोलिसांसाठी मंत्री महाजन ठरले ‘संकटमोचक’

चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…

6 hours ago