नाशिक

चांदवड-देवळ्याचा दुष्काळी कलंक पुसणार

आ. डॉ. राहुल आहेर : जलसमृद्धी अभियानाचा संकल्प

चांदवड : वार्ताहर
गेल्या अनेक दशकांपासून चांदवड आणि देवळा तालुक्यांच्या पाचवीला पुजलेला दुष्काळ हा शब्द आता इतिहासजमा होणार आहे. या दोन्ही तालुक्यांचा कायापालट करण्यासाठी आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या कल्पनेतून ‘जलसमृद्धी अभियान’ हाती घेण्यात आले असून, आगामी चार वर्षांत प्रत्येक गावातील पाण्याचा प्रश्न निकाली लावण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. चांदवड येथील मध्यवर्ती प्रशासकीय सभागृहात आयोजित या अभियानाच्या नियोजन बैठकीत ते बोलत होते.
व्यासपीठावर माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार अनिल चव्हाण, गटविकास अधिकारी मच्छिंद्र सांबळे, कृउबा सभापती नितीन आहेर, माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, भाजप तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, संदीप काळे, निवृत्ती शिंदे, अशोक भोसले, डॉ. नितीन गांगुर्डे, मोहनलाल शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. या अभियानाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे,हे केवळ सरकारी फाइल्सपुरते मर्यादित न राहता थेट बांधावर पोहोचणार आहे. आमदार डॉ. आहेर यांनी सांगितले की, सिंचन विभागाच्या अधिकार्‍यांसोबत आम्ही स्वतः दोन्ही तालुक्यांतील प्रत्येक गावात जाणार आहोत.
या महत्त्वाकांक्षी योजनेला शासनमान्यता मिळाली असून, सध्या त्याचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे पाणी दिंडोरीसह चांदवड आणि देवळा तालुक्यांसाठी वरदान ठरणार आहे. विशेषतः हायराइज कॅनॉलचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्यास या भागातील सिंचन क्षेत्रात वाढ होईल, असा विश्वास डॉ. आहेर यांनी
व्यक्त केला.

लोकसहभागाचे आवाहन

हे अभियान यशस्वी करण्यासाठी लोकसहभागाचे आवाहन करताना आमदार म्हणाले की, “येत्या 26 जानेवारी रोजी होणार्‍या ग्रामसभांमध्ये प्रत्येक गावाने आपापल्या भागातील अपेक्षित सिंचन कामांचे आणि मुख्यमंत्री शेत पाणंद रस्ते योजनेचे ठराव एकमताने मंजूर करून घ्यावेत. पाणंद रस्त्यांच्या कामांसाठी स्वतंत्र निधीची तरतूद केली असून, रस्त्यांचा प्रश्न सुटल्यास शेतकर्‍यांना आपला शेतमाल बाजारपेठेपर्यंत नेणे अधिक सोपे होईल.

प्रशासकीय यंत्रणा सज्ज

प्रांताधिकारी कैलास कडलग आणि तहसीलदार अनिल चव्हाण यांनी या मोहिमेत प्रशासनाच्या वतीने पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. जलसमृद्धी अभियानामुळे भूजल पातळीत वाढ होऊन विहिरींना बाराही महिने पाणी उपलब्ध राहील, यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. या बैठकीला तालुक्यातील सर्व सरपंच, विविध विकास संस्थांचे पदाधिकारी, ग्रामसेवक आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chandwad-Devla will erase the drought stigma

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

1 hour ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

1 hour ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

1 hour ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

1 hour ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

1 hour ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

2 hours ago