मनपा करणार मोडी लिपी तज्ज्ञांचे आउटसोर्सिर्ंग
नाशिक : प्रतिनिधी
जीर्ण झालेल्या जन्म-मृत्यू नोंदी, तसेच ऐतिहासिक मोडी लिपीतील अभिलेखांचे आधुनिक डिजिटायझेशन (संगणकीकरण) आणि भाषांतर करण्यासाठी आवश्यक आर्थिक तरतुदीचा प्रस्ताव मनपाच्या आरोग्य विभागाने महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडे सादर केला आहे. या प्रस्तावामुळे हजारो महत्त्वपूर्ण सरकारी अभिलेख कायमस्वरूपी सुरक्षित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच याद्वारे 35 लाख दाखल्याचे संगणकीकरण केले जाणार आहे. यासाठी मोडी लिपी जाणणार्या तज्ज्ञांचे आउटसोर्सिंग करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे.
नाशिक महापालिकेच्या पूर्व विभागातील जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयातील हजारो जीर्ण व नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या अभिलेखांचा मुद्दा यामुळे सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सन 1957 पासून पुढील वीस वर्षांचे दाखले यात असून, तत्कालीन लिपी समजण्यासाठी जाणकारांची मदत घेण्यात येणार आहे. यासाठी बाह्यस्रोतातून कर्मचारी भरले जाणार असल्याचे महापालिकेचे आरोग्याधिकारी तथा जन्म-मृत्यू मुख्य निबंधक डॉ. विजय देवकर यांनी सांगितले. जन्म आणि मृत्यू दाखले हे प्रत्येक नागरिकाच्या कायदेशीर अस्तित्वाचे व हक्काचे मूलभूत दस्तऐवज मानले जातात. शाळा-महाविद्यालय प्रवेश, पासपोर्ट, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, सरकारी योजनांचा लाभ, वारसा हक्क, बँक व्यवहार, विमा दावे आणि कुटुंब निवृत्तिवेतन यांसारख्या अनेक महत्त्वाच्या कामांसाठी हे दाखले अनिवार्य असतात. मात्र, पूर्व विभागीय कार्यालयातील हजारो मूळ नोंदी जीर्ण अवस्थेत असल्याने आणि अनेक कागदपत्रे अक्षरशः नष्ट होण्याच्या स्थितीत पोहोचल्याने नागरिकांमध्ये गंभीर चिंता निर्माण झाली आहे. पण महापालिकेने आता याबाबत संगणकीकरणाचा निर्णय घेतल्याने नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.
Computerization of thirty-five lakh birth and death certificates
मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेवर मंत्री छगन भुजबळ यांना संधी दिली जाईल,…
बाजारात गावरान कैर्यांची धूम, महागाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले दिंडोरी : प्रतिनिधी पहिल्या मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने…
कुंभमेळ्याच्या नावाखाली सुरक्षेचे नियम धाब्यावर; यंत्रणांचे सोयीस्कर दुर्लक्ष त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर असल्याने…
ज्याची ’सांस्कृतिक राजधानी’ आणि ’विद्येचे माहेरघर’ असे संबोधल्या जाणार्या पुणे शहराचा गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच…
सहा जून ही तारीख भारतीय इतिहासाला कलाटणी देऊन सुवर्णाक्षरात कोरली गेलेली आहे. तीन शतकांच्या पारतंत्र्यानंतर…
इबोला नावाच्या विषाणूने आफ्रिकन देशांना विशेषतः काँगोला ग्रासले आहे. हा विषाणू नवनव्या रूपात प्रकट होत…