नाशिक

बाजार समित्यांमध्ये पुन्हा शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क

 

ज्याच्या नावे सातबारा तो मतदानास पात्र

लासलगाव  : समीर पठाण

राज्यातील ३०६ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये लाखो सामान्य शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार लवकरच मिळण्याची शक्यता आहे.या संदर्भात नवे सरकार कायद्यामध्ये लवकरच सुधारणा करणार असल्याची माहिती भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली.

पणन कायदा १९६३ मध्ये राज्यात अस्तित्वात आला तेव्हापासून संबंधित बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ग्राम पंचायतींचे सदस्य आणि सेवा सहकारी सोसायट्यांचे सदस्य हे मतदार होते. तथापि, देवेंद्र फडणवीस सरकारने २०१७ मध्ये पणन कायद्यात मोठा बदल केला, बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतीचा सातबारा ज्यांच्या नावाने आहे अशा सर्व शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. त्यानुसार काही बाजार समित्यांमध्ये निवडणूका देखील झाल्या होत्या.

राज्यातील ५० टक्के बाजार समित्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यातील २५ टक्के समित्या तर अशा आहेत, की त्या स्वतःच्या कर्मचाऱ्याचे पगार नियमितपणे करू शकत नाहीत. नियमानुसार बाजार समित्यांना निवडणुकीचा खर्च हा स्वतःच्या निधीतून करावा लागतो. त्यामुळे फडणवीस सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना गरीब बाजार समित्यांना अनंत अडचणी आल्या होत्या. तथापि, महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय बदलला आणि ग्रामपंचायतीचे सदस्य व सेवा सहकारी सोसायट्यांचे सदस्य यांना मतदानाचा अधिकार पूर्ववत केला. आता एकनाथ शिंदे-भाजप युतीचे सरकार हे लाखो शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देणारी पद्धत पुन्हा आणणार असल्याची माहिती आहे.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

18 minutes ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

25 minutes ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

31 minutes ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

37 minutes ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

42 minutes ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

57 minutes ago