पाडळी देशमुख शिवारात चार बिबट्यांचा मुक्त संचार

पाडळी देशमुख शिवारात चार बिबट्यांचा मुक्त संचार

■ रात्री अडीच वाजेपर्यंत गावकऱ्यांचा बिबट्यांवर पहारा

■ प्रभाकर आवारी
■ मुकणे : प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख तब्बल चार बिबटयाचा मुक्त संचार वाढल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असुन वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधुन होत आहे.वनविभाग मात्र सुस्तावले असल्याचा आरोप नागरिकांमधुन होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की पाडळी देशमुख येथील हिवरमाथा शिवारात आठवड्यापासून बिबट्यांच्या मुक्त संचाराने नागरिक भयभीत आहेत. या शिवारातील कुत्रे, पाळीव प्राणी यांना बिबट्याने भक्ष्य बनवल्याची घटना असतांनाच काल शुक्रवारी पाडळी देशमुख गावातील सखाराम धांडे यांचा अंत्यविधी आटोपून मळ्यांमधील नागरिक घरांकडे परतत असतांनाच सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या जवळच राहणारे विलास धांडे यांच्या घराजवळ एका मोटारसायकलवर बिबट्याने धाव घेतली ही माहीती गावकऱ्यांना समजल्यानंतर सरपंच खंडेराव धांडे, उपसरपंच बाळासाहेब आमले, बाळासाहेब धांडे, विलास धांडे, गोकुळ धांडे, वैभव धांडे, डॉ.शुभम वारुंगसे, यांच्यासह काही नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली त्यावेळेस बिबटे झाडावर दबा धरुन बसले होते व सदर घटना वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून सांगितली व बिबट्यामुळे अनुचित प्रकार घडु नये यासाठी सदर गावकऱ्यांनी रात्री अडीच वाजेपर्यंत घटनास्थळी थांबुन होते. मात्र इगतपुरी वनविभागाचे कुणीही घटनास्थळाकडे फिरकले नाही. बिबट्यांनी लहान बालकांना आपले भक्ष्य बनविण्याच्या घटना इगतपुरी तालुक्यात अनेकदा घडल्या असुन तसा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी नागरिकांना सदर घटनेमुळे घराबाहेर पडणेही मुश्किल झाले असुन इगतपुरी वनविभागाला याबाबत अनेकदा कळवूनही याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.

वनविभागाने येथे तात्काळ पिंजरा लाऊन बिबट्याला जेरबंद करावे अन्यथा वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून आंदोलन केले जाईल असा ईशारा पाडळी देशमुखचे सरपंच खंडेराव धांडे, उपसरपंच बाळासाहेब आमले, माजी सरपंच जयराम धांडे, दिनेश धोंगडे, प्रल्हाद धांडे, रतन धांडे, कृष्णा चौधरी आदिंसह ग्रामस्थांनी दिला आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

19 minutes ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

26 minutes ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

32 minutes ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

37 minutes ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

43 minutes ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

58 minutes ago