मुंबई : राज्यातील युवकांसाठी मोठी बातमी आहे . राज्यात लवकरच पोलीस भरतीप्रक्रिया पार पडणार आहे . गृहविभागातर्फे ७ हजार पदांसाठी पोलीस भरतीप्रक्रिया राबविली जाणार आहे . पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी एकाचवेळी ही भरतीप्रक्रिया पार पडणार आहे , अशी माहिती सूत्रांनी दिली आहे . त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे . गृहविभागातर्फे हजार पदांसाठी पोलीस भरतीप्रक्रिया राबविली जाणार आहे . आहे . हीभरतीप्रक्रिया जून महिन्यामध्ये पार पडण्याची शक्यता आहे . लवकरच यासंबंधीची जाहिरात देखील काढली जाणार आहे . त्यादृष्टीने गृहखात्याची सगळी तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती मिळत आहे .
तसेच पहिल्या टप्प्यात ७ हजार पदांच्या भरतीप्रक्रियेनंतर राज्यात लवकरच आणखी एक मोठी भरतीप्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे . राज्यातील विविध पोलीस आयुक्त कार्यालयात आणि जिल्हा पोलीस कार्यालयांमधील २०१ ९ च्या भरती प्रक्रियेनुसार ५२०० पदांची भरती होणार होती . ती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून निवड झालेले उमेदवार सेवेत रुजू होत आहेत . राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरु असताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना पोलीस भरतीसंदर्भात माहिती दिली होती .
लोकसहभागातून साडेतीन लाखांचा रथ; आज भव्य मिरवणूक दिंडोरी : प्रतिनिधी तालुक्यातील मोहाडी येथील ग्रामदैवत श्री…
ओव्हर स्मार्ट नियोजनामुळे नागरिक अन् भाविक हैराण त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर…
नाशिक शहर आणि सभोवतालच्या परिसरात मागील महिन्याभरात धो..धो.. पाऊस बरसला आहे. नाशिक जिल्ह्यात जुलै महिन्यात…
कॉक्रोच जनता पार्टीच्या ‘चलो संसद’ आंदोलनात 20 जुलै रोजी प्रचंड हंगामा झाला. विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी…
पाच जणांचा मृत्यू; नागरिकांमध्ये प्रचंड संताप नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर शहरात हजारो कोटी…
अन्यथा अधिकार्यांवर कारवाई, ठेकेदारही रडारवर नाशिक : प्रतिनिधी वर्षभरात सिंहस्थ कुंभमेळा होत असल्याने शहरात रस्ते…