नाशिक शहर

उच्च शिक्षणाचे मुख्य ध्येय ज्ञाननिर्मिती : डॉ. संजीव सोनवणे

शैक्षणिक प्रशासन आणि व्यवस्थापन परिषदेचे नाशकात उद्घाटन

नाशिक : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होणार असून, या धोरणात उच्च शिक्षणाचे मुख्य ध्येय हे ज्ञाननिर्मिती हेच आहे. या धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी आधी या धोरणाचा आत्मा नीट समजावून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी शनिवारी येथे केले.

महाराष्ट्र शैक्षणिक प्रशासन आणि व्यवस्थापन परिषद, पुणे या संस्थेची ३१ व्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गुरुदक्षिणा संकुलतील प्रिं. टी. ए. कुलकर्णी सभागृहात झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून  डॉ. संजीव सोनवणे बोलत होते. गोखले एज्युकेशन सोसायटी आणि डॉ. एमएसजी फाऊंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद भरविण्यात आली असून, शताब्दी साजरी करत असलेल्या एचपीटी आर्ट्स अ‍ॅण्ड आरवायके सायन्स महाविद्यालयाकडे परिषदेचे यजमानपद आहे. महाराष्ट्र शैक्षणिक प्रशासन व व्यवस्थापन परिषद, पुणे यांच्या  ‘शैक्षणिक प्रशासन व व्यवस्थापनाची राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२० च्या अंमलबजावणीमधील भूमिका ‘ या विषयावर परिषदेत चर्चा होत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव डॉ. दीप्ती देशपांडे होत्या. प्रख्यात अभियांत्रिकी तज्ज्ञ डॉ. एस. पी. कल्लुरकर, परिषदेचे सचिव डॉ. के. आर. शिंपी व्यासपीठावर उपस्थित होते.

नवीन शैक्षणिक धोरणामुळे संपूर्ण शिक्षण होणार्‍या बदलाचे नेतृत्व करणारे सक्षम प्रशासन गरजेचे आहे. या धोरणात परिपूर्ण शिक्षणाचा विचार पुढे येत आहे. त्यासाठी विविध नवीन कौशल्यांची आणि शिक्षणपद्धतींची गरज लागणार आहे असेही डॉ. सोनवणे म्हणाले.

गोखले एज्युकेशन सोसायटीचे दिवंगत सचिव डॉ. मो. स. गोसावी यांनी महाराष्ट्र शैक्षणिक प्रशासन व व्यवस्थापन परिषदेला एका वेगळ्या उंचीवर नेले आणि एक चळवळ निर्माण केली, असे प्रतिपादन डॉ. दीप्ती देशपांडे यांनी केले. नवीन शैक्षणिक धोरण हे अत्यंत योग्य वेळेला तयार झाले आहे. यातील अनेक गोष्टी स्पष्ट होत आहे. सध्याच्या व्यवस्थेतील मर्यादा लक्षात घेऊन पुढे जावे लागेल, असेही त्या म्हणाल्या. डॉ. गोसावी यांनी उच्च शिक्षण क्षेत्राला प्रगल्भ नेतृत्व दिले असे गौरोद्गार डॉ. कल्लुरकर यांनी काढले. शैक्षणिक धोरणाशी संबंधित प्रशासन विषयावर सर्व आयामांनी विचार झाला पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

प्राचार्य डॉ. एम. डी. देशपांडे यांनी उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक आणि अतिथींचा परिचय करून दिला. डॉ. के. आर. शिंपी यांनी परिषद तसेच अन्य आयोजक संस्थांची माहिती दिली. यावेळी एज्युकेअर, तेज:पर्व आणि परिवर्तन या विशेष ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. उद्घाटन सत्राचे आभार परिषदेचे सहसचिव डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. स्नेहा रत्नपारखी आणि डॉ. मुग्धा जोशी यांनी केले. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन सादर केले. कार्यक्रमप्रसंगी डॉ. आर. पी. देशपांडे, डॉ. सुहासिनी संत, डॉ. राम कुलकर्णी, श्री. शैलेश गोसावी, श्री. कल्पेश गोसावी, डॉ. लोकेश शर्मा, डॉ. प्रशांत देशपांडे, डॉ. आशिष चौरासिया आदी उपस्थित होते. या निमित्ताने एक भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाला मान्यवरांसह प्राध्यापक, प्रतिनिधींनी भेट दिली.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

अधिक मासातील अधिक विचार

‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…

23 minutes ago

मरण स्वस्त आणि जगणं महाग

अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्‍यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…

42 minutes ago

खरंच!.. काय होते ते दिवस….

बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…

49 minutes ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात रिक्षाचालकांची मुजोरी

पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…

58 minutes ago

जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र

109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…

1 hour ago

अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका

1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…

1 hour ago