ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य बनले दीनवाणे, संध्याछाया भिवविती हृदया…
नाशिक : मुकुंद बाविस्कर
आपल्या आजी-आजोबांप्रमाणेच समाजात अनेक ज्येष्ठ नागरिक असतात. ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या जीवनमानावर परिणाम करणार्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिन साजरा करण्याची घोषणा संयुक्त राष्ट्राने केली होती. दरवर्षी 21 ऑगस्ट हा दिवस ‘ज्येष्ठ नागरिक दिन’ म्हणून संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. वृद्धांवर परिणाम होणार्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. नाशिक शहरातील विविध ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकार्यांची चर्चा केली असता असे दिसून आले की, अनेकांची मानसिक कोंडी होत आहे.
अनेक वृद्ध लोक त्यांच्या मुलाकडून अत्याचार होत असल्याची तक्रार करतात. त्यांना त्यांच्या मुलांकडून त्रास होतो अनेक जण आपल्या वृद्ध आई-वडिलांना ओझे मानतात. काही लोक त्यांना वृद्धाश्रमात टाकतात आणि त्यांच्या मालमत्तेचे नुकसान करतात.मनुष्याला सर्वात मोठी चिंता किंवा भय कशाचे वाटत असेल तर मृत्यूचे, असे म्हटले जाते. आयुष्याच्या संध्याकाळी त्याचे भय अधिक वाटू लागते. परंतु ज्येष्ठ नागरिकांची निरामय आनंदी जीवन जगावे म्हणून भारतातही ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
आपल्या घरातील, नातेवाइकांतील, परिसरातील किंवा संपर्कातील ज्येष्ठ नागरिकांना रोजचे आयुष्य जगताना आनंद मिळावा म्हणून सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे. भारतातील ज्येष्ठ नागरिकांची आजची संख्या 13 कोटी आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातील ज्येेष्ठ नागरिकांची संख्या एक कोटी 40 लाख आहे. दर्जेदार जीवनशैली, आधुनिक उपचारपद्धती, राहणीमान, सकस आहार व आरोग्याविषयी जागृती आदी बाबींमुळे नागरिकांच्या आयुर्मानात वाढ होत आहे.
जगात जन्माला येणार्या प्रत्येकालाच वार्धक्य हे अपरिहार्य आहे. वार्धक्य हा आजार किंवा रोग नव्हे, तर तो एक परिपूर्ण आयुष्य जगण्याचा सन्मान आहे. परंतु सध्या धावपळीच्या काळात सामाजिक आणि कौटुंबिक जीवन हे सामूहिक न राहता वैयक्तिक आणि व्यक्तिकेंद्रित बनले आहे, त्यामुळे काही जण आपल्या कोशात जगत असल्याने ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य दीनवाणे बनले आहे. त्यामुळे त्यांना संध्याछाया भिवविती हृदया… असे वाटू लागते.
कुटुंबात, समाजात सन्मान मिळावा…
आपले उतारवयातील आयुष्य सुखकर व्हावे, यासाठी ज्येष्ठ नागरिकांची धडपड सुरू असते. साहजिकच समाजाने ज्येष्ठ नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. वृद्धाश्रम नको तर विरंगुळा म्हणून ठिकठिकाणी नाना-नानी पार्क व्हावेत, अशी अपेक्षा ज्येष्ठ नागरिक व्यक्त करतात. ज्येष्ठ नागरिकांना शासनाकडून वैद्यकीय सेवा, प्रवास सेवा, पेन्शन सेवा आदी देण्यात येतात. परंतु यासोयी सवलतींचा फायदा थेट ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचत नाही.
ज्येष्ठ नागरिकांनी केवळ शारीरिक तक्रारी करीत बसण्यापेक्षा मानसिकदृष्ट्या सक्षम राहिल्यास यात उर्वरित आयुष्य सुसह्य होते. काही प्रमाणात आता ज्येष्ठांनीदेखील आपल्या दैनंदिन जीवन आणि विचारांमध्ये बदल केलेला असून, अशी जाणीव अनेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये आता दिसून येत आहे. पूर्वी साठ वर्षे जगणे फार झाले, असे समजले जात होते. परंतु या विचारांमध्ये आता बदल होत आहे.
– मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्तेवयाच्या ज्येष्ठतेनुसार किरकोळ शारीरिक तक्रारींवर मात करून मानसिक समर्थता वाढविल्यास आपल्या वयाच्या कार्यक्षम व्यक्तीकडे बघून नव्याने जगण्याची उमेद जागवली तर आपले दुःख कमी होऊ शकते. ज्येष्ठ नागरिक विधायक कामात गुंतवून घेऊ शकतात. कुणी बागकामाचा छंद जोपासतात, तेव्हा मनाला एक वेगळ्या प्रकारचे समाधान लाभते. ज्येष्ठ नागरिकांनी आजारांवर मात करण्यासाठी योग्य आहार-विहार, योगासने व व्यायाम करायला हवा.
– प्रा. यशवंत पाटील, ज्येष्ठ लेखक
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…