मंत्री सामंत ः चारशे एकर जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी शेतकर्यांशी चर्चा
नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यात येत्या काळात एका नामांकित कंपनीकडून पाच हजार ते 14 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येणार असल्याची आनंदवार्ता दिली आहे. या कंपनीसाठी लागणार्या चारशे एकर जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी शेतकर्यांशी चर्चा केली असून, वर्षभरात हा प्रकल्प सुरू होईल, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले.
उद्योजक संघटनांशी चर्चा करण्यासाठी नाशिक दौर्यावर आले असता, बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
नाशिकमध्ये राजूर बहुला येथील 25 एकर जागा आयटी पार्कसाठी उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय आडगाव येथे यापूर्वीच जाहीर झालेल्या 15 एकर जागेवर आयटीपार्क मार्गी लावण्यासाठी उपाययोजना करणार आहे. उद्योजकांना यापूर्वी द्यावा लागणारा दुहेरी फायर टॅक्स बंद करण्यात आला आहे. यासंदर्भात असलेला वाद सोडवण्यासाठी महापालिका आयुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या पंधरा दिवसांत हा प्रश्न सुटलेला असेल, असेही ते म्हणाले. गोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी 12 कोटींंचे जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात येणार असून, त्यासाठी टेंडरही काढण्यात आल्याची माहिती मंत्री सामंत यांनी दिली.
प्रदर्शन केंद्र साकारले जाणार
गेल्या अनेक वर्षांपासून उद्योजकांकडून शहरात प्रदर्शन केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत होती. या मागणीची दखल घेत प्रदर्शन केंद्रासाठी जागेची उपलब्धता मनपा करून देणार असून, प्रदर्शन केंद्र उभारण्याचा खर्च एमआयडीसी करणार आहे. 11 वर्षे प्रदर्शन केंद्राचा वापर उद्योजकांना करता येणार व सिंहस्थातील एक वर्ष प्रदर्शन केंद्र मनपाकडून सिंहस्थासाठी वापरण्यात येणार आहे. प्रदर्शन केंद्राच्या उभारणीच्या निविदा काढण्याच्या सूचना दिल्याची माहिती मंत्री सामंत यांनी दिली.
कोचरगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाच ग्रामस्थ जखमी दिंडोरी: प्रतिनिधी तालुक्यातील कोचरगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाच…
द्वारका परिसरात दुकाने, पत्र्याचे शेड हटवले अतिक्रमण हटाव मोहीम जोमात; वडाळा गाव: प्रतिनिधी शहरातील प्रमुख…
निर्दयी पत्नीचे बिंग दोन महिन्यांनंतर फुटले सुरगाणा : प्रतिनिधी पतीची कुर्हाडीच्या सहाय्याने हत्या केल्यानंतर मृतदेहाचे…
ल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, चित्रपट निर्माते,…
ध्या प्रत्येक समाजात समाजकार्य करण्याची स्पर्धा लागली आहे. प्रत्येक जण स्वतःला सामाजिक कार्यकर्ता समजत आहे.…
अहमदाबादमध्ये गुरुवारी (दि. 12) एअर इंडियाचे बोईंग 787 ड्रीमलायनर हे बहुचर्चित विमान आकाशात झेपावले आणि…