जनशताब्दीचे इंजिन फेल झाल्याने अडीच तास गाडी रुळावर,प्रवाशी हतबल
लासलगाव: समीर पठाण
जनशताब्दी एक्सप्रेसचे इंजिन फेल झाल्याने जालना-दादर जनशताब्दी एक्सप्रेस आज शुक्रवारी सकाळी लासलगाव रेल्वे स्थानकादरम्यान अचानक उभी राहिली.थोडा वेळ प्रवाशांनी हा प्रकार सहन केला.मात्र, एक-दीड तास झाला तरी रेल्वे जागेवरच उभी असल्याने प्रवाशी संतप्त झाले.कडाक्याच्या उन्हात रेल्वे रुळावरच उभी राहिल्याने प्रवासी वैतागून गेले.इंजिन फेल झाल्याने जनशताब्दी एक्सप्रेस रुळावरच अडीच तास उभी राहिली.परिणामी,मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
जनशताब्दी एक्सप्रेसचे इंजिन आज सकाळी ११.३० वाजता फेल झाले.त्यामुळे ही एक्सप्रेस लासलगाव-निफाड रेल्वे स्थानकादरम्यान उभी राहिली. काही तांत्रिक कारणास्तव रेल्वे थांबल्याचे प्रवाशांना वाटले.मात्र,अनेक तास झाले तरी रेल्वे पुढे जात नसल्याने प्रवासी संतप्त झाले.बेजबाबदार रेल्वे प्रशासनमुळे ऐन उन्हाळ्यामध्ये ज्येष्ठ नागरिक,लहान बालके,महिला या सर्वच प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
रेल्वेच्या कारभाराबाबत प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.तब्बल अडीच तासांच्या काळात रेल्वेकडून कोणतीही सूचना प्रवाशांना देण्यात आली नाही. त्यामुळेही प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान,मनमाडहून मुंबईकडे जाणाऱ्या सर्व प्रवाशी गाड्या विलंबाने धावल्या.
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…
वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…