आस्वाद

कसबा चिंचवडचे पडसाद पालिका निवडणुकीत उमटणार

गोरख काळे

 

 

 

राज्यात शिक्षक व पदवीधर विधानपरिषद निवडनुकीचा बिगूल वाजून झाल्यानंतर आता पुण्यातील कसबा व चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक होत आहे. राज्यातील सत्ता उलथापालथ झाल्यानंतर पहिल्यांदाच सत्ताधारी आणि महा विकास आघाडी सरकार जनतेच्या न्यायालयात जाणार आहे. त्यामुळे राजकिय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यात मागील सहा ते सात महिन्यात अशा काही घटना घडल्यात की त्या, जनसामांन्यांच्या दुष्टीने खळ्बळ उडवून देणार्‍या ठरल्या आहे. त्यामुळे जनतेच्या मनात काय आणि त्यांचा कौल काय, या सर्वांची उत्तरे कसबा व चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालातून समोर येणार आहे. मात्र या निवडणुकीत जे निकाल येतील ते आगामी नाशिकसह इतर महापालिकांच्या निवडणुकीवर त्यांचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : उद्विग्नता
नाशिक महानगरपालिकेसह राज्यातील 18 पालिकेंची निवडणूक ओबीसी आरक्षण, प्रभाग रचना या मुद्यांवरुन सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. नाशिक महापालिके तील लोकप्रतिनिधीं चा कार्यकाल 13 मार्च 2022 रोजी संपुष्टात आला. त्यानंतर निवडणूक पुढे पुढेच ढकलण्यात आली. राज्यात सत्त्ता उलथापालथ झाल्यानंतर शिंदे गटात नाशिकमधून अनेक पदाधिकार्‍यांनी प्रवेश केला. त्यामुळे पालिका निवडणुकीत नाशिककरांचा यंदा चा कल काय असणार हे, की आताच सांगणे कठीण आहे. मात्र सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती ढवळून निघाली असून अनपेक्षित घटनांमुळे जनता बुचकळ्यात पडली आहे. अनेकजण या वर संताप व्यक्त करत असल्याचे चित्र आहे. दरम्यान भाजपाने नाशिकमध्ये निवडणुकीचे रणशिंग फूकले आहेत. ना. गिरीश महाजन यांनी तर नाशिक पालिकेत पुन्हा भाजपाचीच सत्त्त्ता येणार असल्याचा दावाच करुन टाकला आहे. नुकतेच शहरात भाजपाचे दोन दिवसीय राज्य अधिवेशन झाले. या अधिवेशनाच्या माध्यमातून नाशिकमधील भाजप पदाधिकार्‍यांनी आगामी पालिका निवडणुकीचीच रणनिती असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. राज्यात ज्या पध्दतीने महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात आले. ते सर्वसामान्य नागरिकांना पटलेले नाही, याची परतफेड जनता करणारच असा दावा ठाकरे गटाच्या नेत्यांसह महाविकास आघाडी कडून दररोज केला जातो आहे. तर भाजप-शिंदे गटाकडून महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला करत जनतेचे सरकार आम्ही बनवले असल्याचे सांगत आहे.

कसबा आणि चिंचवड या निवडनुकीच्या माध्यमातून जनता कोणाच्या बाजूने त्यांचे मत टाकणार यावरील चित्र स्पष्ट होणार आहे. यापूर्वी राज्यात झालेल्या शिक्षक, पदवीधर विधानपरिषद निवडणुकीत महा विकास आघाडीला यश मिळाले होते. त्या निवडणुकीत शिक्षक व पदवीधरांनाच मतदानाचा हक्का होता. मात्र कसबा आणि चिंचवडच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक थेट मतदान केंद्रावर जाणार आहे. यापूर्वी मुंबइत अंधेरी पोटनिवडणुकीत जनतेच्या मनता काय हे समजून येण्यापूर्वी भाजपने माघार घेऊन टाकली होती. त्या निवडणुकीनंतर आता एकाच वेळी दोन्ही ठिकाणच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी विरुध्द भाजप-शिंदे यांच्या मध्ये समोरासमोर लढत होत आहे. या निवडणुकीच्या निकालातून मात्र नाशिक पालिका निवडणुकीत काय प्रभाव जाणवेल, यावरुन बरीच चर्चा सुरु झाली आहे. या दोन्ही ठिकानांचा कल ज्याच्या बाजूने असेल त्याच्या बाजूने जनमत असणार असे बोलले जाऊ लागले आहेत. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष कसबा, चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीकडे लागले आहेत. या दोन्ही निवडणुका पुण्यात होत असल्या तरी त्यांचे पडसाद येणार्‍या नाशिक महानगर पालिका निवडणुकीत दिसून येऊ शकतात.

 

 

नाशिक पालिकेत प्रशासक राजवटीला वर्षपूर्ती

 

नाशिक महानगरपालिकेची वेळेत निवडणूक न झाल्याने 13 मार्च रोजी महापालिकेत प्रशासक राजवट येऊन वर्षपूर्ती होणार आहे. अद्यापही पालिका निवडणूक संदर्भात कोणतीही शक्यता दिसून येत नाही. परंतू ऑक्टोबर मध्ये निवडणुकीचा बिगूल वाजण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी पुणे जिल्ह्यात होणार्‍या निवडणुका एकप्रकारे जनमत चाचणी यानिमित्त्ताने होत असल्याची चर्चा नशिकच्या राजकीय वर्तुळात आहे.

 

 

….
नाशकातील शिंदे ठाकरे गट लक्ष ठेवून

 

नाशिक शहरात शिंदे गटात दाखल झालेल्या नेत्यांचे लक्ष देखील या निवडणुकीकडे लागून आहे. सध्य सोशल मीडियावर भाजपविरोधात अन शिंदे गटा विरोधात वातावरण असल्याचा दावा विरोधकांकडून वारंवार केला जातो आहे.  दरम्यान पुण्यातील निवडणुकीत शिंदे गटाचे उमेदवार नसले तरी त्याकडे नाशिकमधील शिंदे आणि ठाकरे गटाचे निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष ठेऊन आहेत.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

4 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

4 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

5 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

5 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

5 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

5 hours ago