आस्वाद

उद्विग्नता

करंट इश्यू

अश्‍विनी पांडे

शाहरूख खानच्या ओम शांती ओम चित्रपटातील लोकप्रिय संवाद ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’ हे ऐकल्यानंतर जितकी उत्स्कुता निर्माण होणार नाही त्याहुन जास्त उत्स्कुता सद्या महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या तोंडी असलेल्या संवादावरून निर्माण होत आहे. आणि महाराष्ट्रातील राजकारण क्लायमॅक्सला पोहोचले वाटत असतानाच थरारक घटना घडून पुढे काय होणार, याची उत्स्कुता निर्माण होत आहे.

हेही वाचा : भाजपाचा गनीमा कावा !.

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अडीच वर्षापासून सुरू असलेला पॉलिटिकल ड्रामा थांबायचे नाव घेत नाही. सततच्या ट्वीस्ट ऍण्ड टर्नमुळे एखाद्या चित्रपटाला लाजवेल इतकी रंजकता राजकीय पटलावर निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या काय चाललय म्हणल त्या प्रश्नाचे उत्तर असेल राजकारण. कारण कॉलेज असो वा गावाचा पार अथवा चहाची टपरी असो वा कॉर्पोरेट ऑफिस प्रत्येक ठिकाणी राज्याच्या राजकारणावर चर्चा सुरू आहेत. त्यात नागरिक आपापल्या गटाची अथवा पक्षाची बाजू घेऊन एकमेकांशी भांडत आहेत तर काही जण राजकीय विश्लेषकांप्रमाणे प्रत्येक घटनांच विश्लेषन करत आहेत. त्यात अनेक जण प्रेमात, युध्दात आणि सद्यस्थिती पाहता  राजकारणातही सर्व काही शक्य असते, असे म्हणत सद्य राजकीय स्थितीचे समर्थन करताना दिसत आहेत. मात्र प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. त्या मर्यादेचा अंत झाला की निर्माण होते ती प्रचंड चीड किंवा त्याही पलिकडे जाऊन उद्गिगणता! महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातही संतापाबरोबरच उद्विगणता आहे. सत्तासंघर्षाच्या सुनावणीच्या वेळी ती न्यायालयात देखील दिसून आली. ठाकरे गटाची बाजू प्रभावीपणे मांडताना कपिल सिब्बल यांनी जोरकसपणे लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, या मुद्दयावर भर देताना ही केस मी हरेन, किंवा जिंकेन हे महत्वाचे नाहीय, लोकशाही जी 1950 पासून चालत आली आहे. ती जगली पाहिजे, असे म्हणत आपल्या युक्तिवादाचा समारोप केला. ही पण एक प्रकारची उद्विगणताच आहे. सोशल मीडियावर जर नजर टाकली तर त्यातही सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रियेतूनही हेच समोर येते.

 

हेही वाचा :आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्री शिंदे यांना आव्हान

राजकारणात काय सुरू आहे, याबाबत सामान्य नागरिकांमध्ये उत्स्कुता असते. कारण राजकारणाची दशाच राज्याच्या विकासाची दिशा ठरवत असते. मात्र राजकीय पक्षाच्या राजकारणालाच काहीच दिशा राहिली त्यामुळे राज्याची दशा होणार हे निश्चित.
कॉग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट ,भाजपा आणि शिवसेना शिंदे गट या प्रमुख पक्षामध्ये सद्या सुरू असणार्‍या राजकारणामुळे जनतेला किळस येत आहे. सतत टीका, आरोप, कुरघोडी यातच सर्व राजकीय पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते अडकून पडलेले दिसत आहे. त्यामुळे राज्याच्या विकासाच्या प्रश्नांवर चर्चा होताना दिसत नाही. जणू मुलभूत प्रश्न संपल्याप्रमाणे सर्वजण वावरताना दिसत आहे. विशेष करून इलेक्ट्रॉनिक मीडियावर सततच्या सुरू असणार्‍या आरोपांच्या फैरी पाहिल्यानंतर राज्यात सर्वच सुफलम मंगलम चालल्याचा आभास निर्माण होतो.

हेही वाचा : पालिकेच्या निवडणुका थेट पुढच्या वर्षी

 गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेल्या घडामोडी पाहता सर्वच पक्ष एकाच माळेचे मनी असल्याचे स्पष्ट झाले आहे. राजकीय विचारधारा हा गोंडस शब्द फक्त निवडणूक प्रचारात वापरण्यात येतो. निवडणुका झाल्यानंतर कोणीही कोणाशी अभद्र युत्या आघाड्या करू शकतात हे दिसून आले.  सेक्युलर विचारधारा असलेला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष भाजपाला 80 तास मुख्यमंत्री असताना चालू शकतो. त्याचप्रमाणे हिंदुत्ववादी शिवसेनेला कॉंग्रेस- राष्ट्रवादी हे पक्ष सत्तेसाठी चालू शकतात हे स्पष्ट झाले आहे.त्यामुळे कोणीही कोणावर आरोप करत मी कसा धुतल्या तांदळासारखा आहे हे सांगत असले तरी ‘सब घोडे बारा टक्के’ हे जनतेला कळून चुकले आहे. त्यामुळे आपण ठराविक पक्षाला मतदान केल्यानंतर आपल्या मतांची प्रतारणा करत विरोधी पक्षांची युती आघाडी करत सरकार स्थापन केलेेेे जात असल्याने  लोकशाहीला अर्थात जनभावना मतदानाला काडीची किंमत उरत नाही हे ही तितकेच खरे!

 

हेही वाचा : राजकारणात महापुरूषांना आणू नका : खा.अमोल कोल्हे

 

 

 

 सद्य राजकीय स्थिती पाहता याचे दुरगामी परिणाम महाराष्ट्राच्या समाजकारणावर होणार आहेत.तरूणवर्ग हा आधीच राजकारणापासून अलिप्त राहतो कारण  त्यांना राजकारणाचा तिटकारा आहे. त्यामुळे गेल्या काही निवडणुकीत नोटा पर्यायाचा वापर करणार्‍यांची संख्या लक्षणिय होती. राज्याच्या अथवा देशाच्या राजकारणात सद्या जे राजकीय पक्ष अस्तित्वात आहे.. त्यांना मतदान करण्यापेक्षा नोटा पर्यायाचा वापरण करणे जास्त हितावह असल्याचे जनतेला वाटल्यास आश्‍चर्य वाटायला नको.!

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

अधिक मासातील अधिक विचार

‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…

16 minutes ago

मरण स्वस्त आणि जगणं महाग

अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्‍यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…

35 minutes ago

खरंच!.. काय होते ते दिवस….

बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…

42 minutes ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात रिक्षाचालकांची मुजोरी

पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…

51 minutes ago

जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र

109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…

59 minutes ago

अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका

1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…

1 hour ago