प्रेमविवाह करणाऱ्यांना आता खाकीचे सुरक्षा कवच, नाशिकच्या पोलीस आयुक्तालयात स्थापन केला विशेष कक्ष

प्रेमविवाह करणाऱ्यांना आता खाकीचे सुरक्षा कवच
शहर पोलीस आयुक्तालयात स्थापन केला विशेष कक्ष
नाशिक : प्रतिनिधी
प्रेमविवाहातून अनेकदा जोडप्याला मारहाण करण्याबरोबरच सैराट सारख्या घटनाही घडतात. त्यामुळे आता आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांना पोलिसांचे सुरक्षा कवच लाभणार आहे. प्रेम विवाह केलेल्या दाम्पत्याच्या तक्रारींवर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आयुक्तालयात विशेष कक्ष स्थापन केला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक आंचल मुदगल यांच्यावर या विशेष कक्षाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रेम विवाह करणाऱ्यांना या विशेष कक्षाच्या माध्यमातून संरक्षणाचे कवच लाभणार आहे.


समाजामध्ये प्रेम विवाह करणाऱ्याचे प्रमाण कमी नाही. आंतरजातीय विवाहातून अनेकदा अप्रिय घटना घडतात. अनेकदा जात पंचायतीच्या निवाड्यातून प्रेम विवाह अथवा आंतरजातीय, आंतर धर्मीय विवाह केलेल्या दाम्पत्याना समाजात जगणे कठीण होऊन जाते. यातून सैराट सारख्या घटनांची देखील पुनरावृत्ती होते . या घटनांना पायबंद घालण्यासाठी आणि प्रेम विवाह केलेल्या जोडप्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी गृह विभाग आणि पोलीस खात्याची असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात रिट याचिकाही दाखल झाली असता या याचिकेत असलेल्या दिशादर्शक निर्देशांचे तातडीने पालन करण्यात यावे, अशा सूचना केंद्र शासित प्रदेश, राज्य व पोलीस प्रमुखांना दिल्या होत्या. त्यानुसार प्रेमविवाह केलेल्या दाम्पत्याना गरजेनुसार पोलीस संरक्षण देखील दिले जाणार आहे. तसेच अशा जोडप्यांना त्रास देणाऱ्या घटकांवर तसेच व्यक्तींवर कायदेशीर कारवाईचा बडगा देखील उगारण्यात येणार आहे.
पोलीस आयुक्त हे या कक्षाचे अध्यक्ष असतील, तसेच जिल्हा समाजकल्याण अधिकारी सदस्य, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हे सदस्य सचिव असणार आहेत.
पोलीस निरीक्षक आंचल मुदगल यांच्यावर या कक्षाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे पोलीस विभागाने काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

खिशात नाही आणा…

खिशात नसताना पैशांचा गजर कशाला, दिखाव्याच्या दुनियेत खोटा हा साज कशाला आई-वडिलांच्या कष्टांवर उभारलेला हा…

2 hours ago

गुन्हेगारीच्या छायेत हरवणारा समाज…

खरंतर समाजात वावरताना वारंवार जाणवणार्‍या या वास्तवामुळेच हा विषय मांडावासा वाटला. कारण तो मांडणं ही…

2 hours ago

स्वमग्नता

अगं आई तो बघ! मावशींचा मुलगा कसे करतो आहे. तो जरा वेडा आहे का? हात…

2 hours ago

शेतीमातीची माणसं…

शेतीची माणसं म्हणजे काळ्या आईची लेकरं.. या काळ्या मातीशी त्यांची नाळ घट्ट जुळलेली असते. या…

3 hours ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात ऑनलाइन रोलेटचा सुळसुळाट

सिडको : दिलीपराज सोनार नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या…

3 hours ago

वावी परिसराचा दुष्काळ हटणार

कोकाटेंच्या पुढाकाराने 1500 हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली सिन्नर : प्रतिनिधी भौगोलिक विषमतेमुळे कायम अवर्षणप्रवण म्हणून…

3 hours ago