लासलगाव: समीर पठाण
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेल्या शुल्कामुळे शेतकरी संतप्त झाले होते.लासलगाव सह जिल्ह्यातील बाजार समित्या गेल्या दोन दिवसांपासून बंद होत्या.आज गुरुवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा लिलाव आवारावर कांद्याचे लिलाव सकाळी पूर्ववत सुरू झाले मात्र नाफेड लासलगाव येथे प्रत्यक्ष लिलाव प्रक्रियेत सहभागी न झाल्यामुळे तसेच खाजगी व्यापाऱ्यांनी
नाफेडच्या कांदा खरेदी दरापेक्षा कमी बोली पुकरल्यामुळे
लासलगाव बाजार समितीत सकाळच्या सत्रातील लिलाव संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बंद पाडले .
केंद्र सरकार नाफेड मार्फत 2410 प्रतिक्विंटल भावाने 2 लाख मेट्रिक टन इतका कांदा खरेदी करेल अशी घोषणा सरकारने केली.मात्र तरीही खाजगी व्यापारी लिलाव सुरु झाल्यावर 1900 ते 2000 रुपये इतक्याच दराने कांदा खरेदी करत असल्याने शेतकरी संतापले आहे.अजून पर्यंत नाफेड ने लासलगाव येथे कांदा खरेदी सुरू केलेली नाही.नाफेड ने लासलगाव बाजार समितीच्या लिलाव आवारात प्रत्यक्ष सहभागी होऊन कांदा खरेदी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी या वेळी केली तसेच या वेळी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली
शेतकऱ्यांना कांदा खरेदीचा भाव २४१० रुपये मिळणे अपेक्षित होता मात्र प्रत्यक्षात लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लिलाव आवारात ज्यावेळी लिलाव सुरू झाले त्यावेळी खाजगी व्यापाऱ्यांनी १९०० ते २००० रुपये प्रति क्विंटल ची बोली पुकारली त्यामुळे शेतकरी संतापले व कांदा लिलाव बंद पाडले.नाफेड ने लासलगाव बाजार समितीच्या लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊन प्रत्यक्ष कांदा खरेदी करावा अशी जोरदार मागणी या वेळी शेतकऱ्यांनी केली.
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…