उत्तर महाराष्ट्र

नाशिकच्या प्रेमीयुगुलाने उचलले टोकाचे पाऊल

धार्मिक विधीच्या नावाखाली पती-पत्नी बनून आले अन…
त्र्यंबकेश्‍वर : प्रतिनिधी
नाशिक येथील एका प्रेमीयुगुलाने त्र्यंबकेश्‍वर येथील लॉजमध्ये विषारी औषध सेवन करुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्र्यंबकेश्‍वर येथील प्रितम लॉजमध्ये नाशिक येथील तानाजी रामराव चौधरी (40, राहणार गांधी नगर ) आणि रूपाली महेश जाधव (35, राहणार जाधव संकुल सातपूर) यांनी आपण पती-पत्नी असल्याचे सांगत त्र्यंबकेश्वर मंदिराच्या समोरच असलेल्या  लॉज येथे रुम घेतली होती. बुधवारी रात्री आठच्या सुमारास ते मुक्कामी आले होते. धार्मिक विधी करण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. तानाजी चौधरी याने आपले आधार कार्ड आणि पॅन कार्ड ओळख म्हणून सादर केले.तशी रजिस्टरमध्ये नोंद केली. मात्र रात्री 1 ते 2 वाजेच्या दरम्यान महिलेला उलटया होत आहेत म्हणून ती बाहेर आली.त्यानंतर तेथे काम करणा-या रूम बॉयला संशय आल्याने त्याने खोलीमध्ये डोकावून पाहिले असता तेथे किटनाशक तसेच पिण्याच्या पाण्याच्या दोन छोटया बाटल्या,मद्याची बाटली दिसून आली. त्याने आपल्या सहका-यांच्या मदतीने दोघांना त्र्यंबकेश्‍वरच्या उपजिल्हा रुग्णालयात हलवले. तेथील वैद्यकीय अधिका-यांनी प्रथमोपचार केले मात्र त्यांची अवस्था पाहून तातडीने जिल्हा रूग्णालयात पाठवले. तेथे सकाळी 6.30 वाजता तानाजी चौधरी हा मृत झाला तर रूपाली जाधव हिची दुपारी 4.30 वाजता प्राणज्योत मालवली.त्र्यंबकेश्‍वर पोलीस ठाण्यात शुक्रवारी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस या घटनेच्या मागे असलेल्या कारणांचा शोध घेत आहेत.

Bhagwat Udavant

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

17 hours ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

18 hours ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

18 hours ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

18 hours ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

18 hours ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

18 hours ago