नाशिक : प्रतिनिधी
बिपीन बाफना खून खटल्याचा निकाल तब्बल अकरा वर्षानंतर लागला. याप्रकरणी दोषी मुख्य आरोपी चेतन पगारे आणि अमन जट यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने आज फाशीची शिक्षा सुनावली. न्यायाधीश अदिती कदम यांच्या न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.
संपूर्ण जिल्ह्यात गाजलेल्या या खटल्याच्या निकालाकडे अनेकांचे लक्ष लागून होते.
बिपीन बाफना या युवकाचे 10 जून 2013 रोजी एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करत आडगाव शिवारात नेऊन खून करण्यात आला होता. याप्रकरणी अक्षय सुळे, संजय पवार, पम्मी चौधरी यांची यापूर्वीच न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. तर दोघांना दोषी ठरविले होते. सरकार पक्षातर्र्फे एकूण 35 साक्षीदार तपासण्यात आले.
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…