गृहिणींपुढे गंभीर प्रश्न; भाजीपाला शंभरीपार!
नाशिक ः प्रतिनिधी
एकीकडे सर्वच प्रकारच्या डाळींचे भाव कडाडले असतानाच, भाजीपाल्याचे दरही शंभरीपार गेल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. भाजी तरी कोणती करावी? असा प्रश्न घराघरांत सतावत आहे.
दमदार पावसाला सुरुवात झाल्यापासून भाजीपाला दरात वाढ झाली आहे. संततधार पाऊस होत असल्याने शेतातच भाजीपाला पिवळा पडण्याचे प्रमाण वाढले असल्याने बाजारात येणार्या भाजीपाला आवकवर मोठा परिणाम जाणवत आहे. त्यामुळे भाजीपाला दरात तेजी आली आहे. गवार 150 रुपये तर दुधी भोपळा प्रतिनग 25 ते 30 रुपये मिळत आहे. त्यात डाळी, कडधान्य, किराणामालाचेही भाव चढेच असल्याने गृहिणींची स्वयंपाकाची कसरत होत आहे.
पावसाळ्यात भाजीपाला मुबलक येत असला तरी अतिवृष्टीमुळे भाजीपाला सडतो, पिवळा पडतो, त्याशिवाय गवारसारख्या भाज्यांना उष्ण वातावरण हवे असते. त्यामुळे पावसाच्या वातावरणाचा परिणाम होत असल्याने आवक कमी होत आहे. परिणामी, गवारचे भाव 150 रुपये किलोपर्यंत वाढले आहेत. टोमॅटोची आवक वाढल्याने दर कोसळले आहेत.
पालेभाज्या पावसाळ्यात लवकर खराब होतात. त्यामुळे कोरडी आणि विनामातीच्या भाजीला चांगला भाव मिळतो. त्यामुळे मेथी, पालक, शेपू, कांदापात, कोथिंबीर यांना जुडीला 40 ते 50 रुपये मोजावे लागत आहे. उन्हाळ्यात वीस ते तीस रुपयांना तीन लिंबू मिळत होते. ते आता दहा रुपयांत तीन तर किलोला 70 रुपये मिळत आहे. चांगल्या आल्यालाही 60 ते 70 रु. किलो भाव
आहे.
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…