इच्छुक उमेदवारांचा हिरमोड; मोबाइलवरील स्टेटसही गायब
दिंडोरी ः प्रतिनिधी
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सारख्या पुढे ढकलत असल्यामुळे निवडणूक लांबणीवर जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांचा हिरमोड होताना दिसत आहे, तसेच काही उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधून आपल्या गटातील गावांमध्ये वाढदिवस, लग्नसमारंभ, अंत्यविधी, दशक्रिया विधी अशा अनेक कार्यक्रमांना इच्छुक उमेदवारांकडून न चुकता हजेरी लावली जात होती.
तसेच स्वतःच्या व हितचिंतक, समर्थक, कार्यकर्ते यांच्या मोबाइलवर व गटातील व्हॉट्सअॅप ग्रुपवर दररोज निवडणुकीसंदर्भात वेगवेगळे स्टेटस व रील ठेवले जात होते. परंतु, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे आरक्षण ज्या विभागात पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे, तेथील निवडणुकीवर काही ग्रामस्थांनी हरकत घेतली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीची सुनावणी 21 जानेवारीला ठेवल्याने इच्छुक उमेदवारांनी गुडघ्याला बांधलेले बाशिंग उतरविण्याची वेळ आली आहे. तसेच इच्छुक उमेदवारांनी आपल्या गटामध्ये गावागावांत भेटीगाठी सुरू केल्या होत्या; परंतु ही निवडणूक लांबणीवर जात असल्याने भेटीगाठी करताना दिसत नाही, तसेच आपल्या
स्वतःच्या व कार्यकर्ते, समर्थक यांच्या मोबाइलवरही निवडणुकीसंदर्भात स्टेटस व रील दिसत नाहीत. याचाच अर्थ इच्छुक उमेदवारांची निराशा मावळली की काय, असे चित्र बघायला मिळत आहे. त्यातही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे, ज्या ठिकाणी आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे, त्या ठिकाणी आरक्षण बदल करण्यात येणार असल्याने इच्छुक उमेदवारांची धडकी अजूनच वाढली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीच्या आत घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळे मी माझ्या गटातील गावांमधील कार्यकर्ते, समर्थक तसेच स्थानिक प्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच, गावांतील नेतेमंडळी यांच्याशी भेटीगाठी सुरू केल्या होत्या. निवडणूक पुन्हा लांबणीवर पडल्याने हिरमोड झाला आहे, तसेच ज्या विभागात 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण असेल, तेथे बदल करण्यात येणार असल्याने इच्छुक उमेदवारांची धडकी भरली आहे.
-सोमनाथ वतार, इच्छुक उमेदवार, मोहाडी गट
- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…
- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…
ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…
आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…
पंचवीस वर्षांपासून शेतकर्यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…