दोन मजुरांना अटक
सटाणा: प्रतिनिधी : बागलाण तालुक्यातील नामपुर येथे पैशांच्या वादातून एका तरुणाचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी मध्यरात्री ही घटना उघडकीस आली असून जायखेडा पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.
नामपुर कृषि उत्पन्न बाजारसमितीतील कांदा व्यापारी सचिन मुथा यांच्या कांद्याच्या खळ्यावर कामाला असलेल्या तीन मजुरांमध्ये पैशांवरून वाद झाला. वादाचे पर्यावसान हाणामारीत होवून बिकासकुमार आणि अनिल कुमार या दोन तरुणांनी मुकादम शिवानंद कामत (वय 41) याचा इलेक्ट्रिक वायरने गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी कांदा व्यापारी सचिन मुथा यांनी जायखेडा पोलिसांना माहिती दिली असता सहायक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी घटनास्थळी धाव घेवून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. प्राथमिक माहितीनुसार मुकादम शिवानंद कामत आणि आरोपींमध्ये केवळ दोन हजार रुपये देण्याघेण्यावरून वाद झाला. आणि या वादातच दोघांनी मुकादम शिवानंद याचा गळा आवळून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…