नाशिक

शासनाच्या समितीकडून पालिकेच्या आर्थिक बेशिस्तीची चौकशी सुरु

नाशिक : प्रतिनिधी

आठशे कोटी रुपयांच्या भूसंपादनाबाबत पालकमंत्री उगन भुजबळ यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे शासनाने चौकशी सुरू करण्याचे ठरवले आहे . नगररचना संचालकांना सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत . त्यानुसार चौकशी सुरू झाली असून , या प्रकरणात भूसंपादनाच्या त्या वादग्रस्त ७० फायली नगररचना उपसंचालक हर्षल बाविस्कर यांनी ताब्यात घेत संचालकांकडे सुपूर्द केल्या आहेत . त्यामुळे आता चौकशीत नक्की काय निष्पन्न होते , याकडे लक्ष लागून आहे . दरम्यान , राज्य शासनाकडून आधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली असून , या समितीने सोमवारपासून चौकशी सुरू केली आहे . राज्य शासनाकडे आलेल्या आर्थिक बेशिस्तीच्या तक्रारी , पालकमंत्र्यांचे आढावा बैठकीतील निरीक्षण , विद्यमान आयुक्तांकडून आर्थिक बेशिस्तीविरोधात सुरू असलेली मोहीम या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित चौकशीविषयी उत्सुकता आहे . स्थायी समितीच्या आर्थिक बेशिस्तीचे प्रकरण खर्चाच्या वर्गवारीत भूसंपादनासह ठराविक मुद्यांना दिले गेलेले महत्त्व , अनावश्यक कामांची घुसखोरी , दायित्वाचा बोजा , निधीची खातेअंतर्गत वळवावळवी , क्लब टेडरिंगच्या नावाने संशयास्पद कामे , यांसारख्या अनेक प्रकाराबाबत मोठी जंत्रीच यापूर्वीच राज्य शासनाकडे तक्रारीतून देण्यात आली आहे . पालिकेचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात आले आहे . राजकीय वातावरण ढवळून निघाले आहेत . या चौकशीतून काय समोर येईल , याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत . या चौकशी समितीकडून महापालिकेतील कामकाजाचा आढावा घेऊन राज्य शासनाला अहवाल दिला जाणार आहे . महापालिकेत भाजपची सत्ता असताना भाजपच्या कामकाजावर शिवसेनेसह विविध पदाधिकाऱ्यांतर्फे अनेकदा शासनाकडे तक्रारी करण्यात आल्या . महापालिकेच्या कामकाजावर टीका करीत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले होते . त्यात , लोकप्रतिनिधीची मुदत संपून प्रशासकीय राजवट सुरू झाल्यानंतर त्यातील अनेक अनावश्यक कामे रद्द करण्यात आली . त्यांच्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही चौकशी करण्याचे सूतोवाच नाशकात केले होते . त्यामुळेच प्रशासकीय यंत्रणेतही राज्य शासनस्तरावरून होणार असलेल्या या चौकशीविषयी उत्सुकता आहे .

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

16 minutes ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

23 minutes ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

29 minutes ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

35 minutes ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

40 minutes ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

55 minutes ago