आपला आनंद आपल्याच हाती!

खरंच इतकं खूश…आनंदी आपण राहू शकतो का हो! लोकांना प्रश्न पडावा की, हे कायमच इतके खूश कसे राहू शकतात?
चिंतनाचा विषय आहे. कधी केलंय यावर चिंतन? खूश राहिलोच आणि काही चुकीची घटना घडली की, लगेच विचार येतो, दृष्ट लागली बाई कुणाची तरी! बरोबर ना!!
चूक आपण करायची आणि दोष दुसर्‍याला! हा स्वभावच तर आनंद हिरावून घेत असतो आपला. विचार चुकला की, आनंद गायब.
24 तास आपण आनंदी राहू शकतो. फक्त थोडं आध्यात्मिक सायन्स समजून घेतलं, त्याप्रमाणे विचार केला, तशी दृष्टी ठेवली, तसं ऐकलं आणि त्याप्रमाणे बोलायला शिकून वर्तनात आणलं तर नक्कीच आपण 24 तास आनंदी राहू शकतो.
पण हे ना आई-वडील शिकवतात, ना शाळा, ना शिक्षक, ना समाज. हे सायन्स आपल्याला समजदार बनवतं. समजदार म्हणजे प्रत्येक परिस्थितीत समान सुख-दुःख, जय-पराजय, यश-अपयश यात मन स्थिर राहिलं की, खरा आनंद कळतो.
परचिंतन, परदर्शन, परमत यातील तिन्ही पर काढून परोपकारी झालात की, निखळ आनंद काय हे समजेल.
जो आयुष्य जगण्यासाठी रोल मिळाला आहे तो (अगदी झाडू मारण्यापासून ते अगदी मोठ्या ऑफिसरचा असो) स्वीकारून मनापासून निभावला की आनंदाची अनुभूती मिळेल.
थिंक ग्लोबली लाइव्ह लोकली, असा जगण्याचा प्रयत्न केला की, आनंद अवतीभवती पिंगा घालेल.
परमात्म्यावरचा खरा विश्वास निर्माण झाला म्हणजे काय तर आपण भगवान को नहीं चाहते, भगवान से चाहते है! तर असेच का झालं आणि भूतकाळातील मान-अपमानांंना फुलस्टॉप करून भविष्यकाळातील चिंता त्याच्यावर सोडून िीशीशपीं जे त्याने आनंदाने जगण्यासाठी गिफ्ट केलंय ते एन्जॉय केलं, तर का नाही आपण 24 तास आनंदी राहू शकणार बरं?
यासाठी ना मंदिरात जायची गरज, ना पूजा घालायची गरज, ना उपवास करायची गरज, ना माळ जपायची गरज, ना कष्ट घेऊन चारधाम करायची गरज.
आपल्याला वाईट सवय लागली आहे. सतत हातात कटोरा घेऊन मागत बसतो देवा पैसा दे रे, आनंद दे रे, सुख दे रे, शांती दे रे! मात्र, विचार जैसे थे!
राग डोक्यात ठेवणारी अनेक लोकं आहेत (विचार न बदलता मेडिटेशन करणारी, पूजापाठ सांगणारी) अगदी वर्षानुवर्षे, पिढ्यान् पिढ्या. किती ती बरोबरी, चढाओढ.
बदला घेण्याच्या भावनेतून अगदी खून, मारामार्‍या.
शब्दातून भोचक तीर मारणे, अपमान करणे, बोलणेच बंद करणे. आपणच बरोबर, दुसरा चूक किंवा दुसराच बरोबर मी चूक असा न्यूनगंड.
या गोष्टींवर चिंतन करून आपणच आपल्यात बदल आणले तर का नाही 24 तास आनंदी राहू शकणार?
या सायन्सला समजून उमजून, अगदी याठिकाणी त्याची पोपटपंची करून तसच्या तसं घोटलं, त्यात मन, मत न मिक्स करता आचरणात आणलं तर आनंदाची दालनं नक्कीच उघडतील.
कारण त्यातच अनेक आनंदाचे राज सामावले आहेत.
जीसको राज समजा वो कभी नाराज नही होते है भाई। उन्हेही हम खुश नशीबवाले केहेते है ।
और ये राज सिखाता है राजयोग मेडिटेशन।
अहो आनंद पैशात नका मोजू!
जसं सुख-दुःख, जय-पराजय, शांती-अशांती, आशा-निराशा तसं आनंदाला विरुद्ध काहीच नाहीये!
निव्वळ आनंदच आनंद!
मग गीता ज्ञान बरोबर सांगत आहे नाही!
इतना खुश रहो की दुनिया परेशान हो जाये की इसे किस बात की खुशी है ।

Our happiness is in our own hands!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *