नाशिक

रिक्षा प्रवासात चोरी करणार्‍या महिलांना अटक

नाशिक : वार्ताहर रिक्षा प्रवासात चोरी करणाऱ्या दोन महिलांना मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे . दागिने व रोकड चोरून नेल्याच्या दोन घटना घडल्या होत्या . याप्रकरणी प्राजक्ता वैभव सोनजे ( रा . महाराणा प्रताप चौक , सिडको ) यांनी फिर्याद दिली होती . प्राजक्ता या ४ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी संभाजी चौक ते दत्त मंदिर स्टॉपदरम्यान रिक्षाने प्रवास करीत असताना २४ हजार ९ ६५ रुपयांचा मुद्देमाल दोन संशयित महिलांनी चोरून नेला होता . १५ नोव्हेंबर २०२१ रोजी भारती गांगुर्डे ( रा . बनकर चौक , काठे गल्ली , व्दारका ) या कराड फरसाण , व्दारका येथून खडकाळी सिग्नलपर्यंत प्रवास करत होत्या . त्यांच्या पर्समधून ५० हजार रुपयांची चोरी झाली . या दोन्ही घटनांचा तपास करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहोकले यांनी दिले होते . पोलीस निरीक्षक चंद्रकांत अहिरे , सहायक निरीक्षक के . टी . रौंदळे , अंमलदार सोनार , टेमगर , पोलीस शिपाई आव्हाड , पानवळ , शेख , गुंजाळ , उगले , साळुंखे , महिला अंमलदार हिरवे यांनी शोध पथके नेमून दोघा संशयित महिलांना ताब्यात घेतले . शनिवारी ( दि . ७ ) महामार्ग बसस्थानकावर दोन संशयित महिला एका चारवर्षीय मुलासोबत परिसरात फिरताना आढळून आल्या . पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली . संशयावरून त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी प्रवासादरम्यान चोरी केल्याचे समोर आले . पोलिसांनी संशयितांची ओळख पटवण्यासाठी तक्रारदार महिला प्राजक्ता सोनजे व भारती गांगुर्डे यांना पोलीस ठाण्यात बोलावले . त्यावेळी महिलांनी दोघा संशयितांना ओळखले . या प्रकरणी मुंबई नाका पोलीस तपास करीत आहेत .

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

16 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

16 hours ago