नाशिक

क्रिप्टो करन्सीबाबत शासनाने धोरण ठरवावे साळगावकर

 

: डॉ. वसंत पवार यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान

नाशिक : प्रतिनिधी

क्रिप्टो करन्सी सामान्यांसाठी निर्माण झाली असली तरी त्याचे रुपांतर आता एक प्रकारे सट्टयामध्ये होत आहे. त्यातून फसवणुकीचेच प्रकार अधिक घडतात. त्यामुळे सरकारने क्रिप्टो करन्सीबाबतचे ध्येय धोरणे लवकरात लवकर स्पष्ट केल्यास त्यामध्ये विश्‍वासार्हता आणि सुसूत्रता येऊ शकेल, असे मत आर्थिक विषयाचे अभ्यासक तथा  कालनिर्णयचे संचालक जयराज साळगावकर यांनी व्यक्त केले.

माजी  खासदार  कर्मवीर डॉ. वसंतराव पवार यांची जयंती गोदावरी बँकेतर्फे प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली त्यानिमित्त आयोजित व्याख्यानात साळगावकर यांचे क्रिप्टो करन्सीवर व्याख्यानाचे आयोेजन करण्यात आले होते. त्यावेळी ते  बोलत होते.  अध्यक्षस्थानी भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेशबाबा पाटील होते.  प्रमुुख  पाहुणे म्हणून माजी महापौर प्रकाश मते, सहकारी बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रह्मेचा, विश्वास ठाकूर, सहकार भारतीच्या अध्यक्षा डॉॅ. शशिताई अहिरे आदी उपस्थित होते.  मोठया व्यवहारांसाठी क्रिप्टो करन्सी  प्रसृत केल्यानंतर किरकोळ व्यवहारांसाठी आभासी चलनाची मुहूर्तमेढ रोवली गेली. आभासी टोकन पद्धतीच्या माध्यमातून ग्राहक आणि विक्रेत्यांना त्यांचे किरकोळ व्यवहार करण्यासाठी या चलनाचा वापर करता येतो. मात्र, त्याला चांगली गुंतवणूक म्हणता येणार नाही. सरकराच्या सर्वभौमत्वाला आव्हान देणारी ही व्यवस्था आहे. सरकारने ते चलनात आणले तरच मान्याता देता येईल.सध्या तरी ते सामान्यांच्या हिताचे दिसून येत नाही.  त्यामुळे आभासी चलनाचा सामान्यांना कितपत फायदा होऊ शकेल, याबाबतच साशंकता असल्याचे साळगावकर म्हणाले. अनिल भालेराव यानी सूत्रसंचालन केले. अमृता पवार यांनी प्रास्ताविक केले.वसंत खैरनार यांनी परिचय करुन दिला.  म़नियार यांनी आभार मानले. यावेळी मविप्रच्या माजी सरचिटणीस नीलिमाताई पवार. नानासाहेब महाले, मविप्र संंस्थेचे अध्यक्ष  सुनील ढिकले, शरद कोशिरे, रत्नाकर कदम, नानासाहेब सोनवणे, माणिकराव शिंदे,वैद्य विक्रांत जाधव, निलीमा जाधव आदीसह नागरिक मोठ्या संख्येनेे उपस्थित होते

 

 

 

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

भुजबळ- जरांगेंमध्ये पुन्हा जुंपली

आरक्षण जीआरवरून एकमेकांवर टीका मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि मंत्री…

6 minutes ago

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

21 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

21 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

21 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

21 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

21 hours ago