सावानाच्या बालनाट्य स्पर्धेला प्रारंभ


नाशिक : प्रतिनिधी
कै. रत्नाकर गुजराथी हे वाचनालयाचे जुने पदाधिकारी होते. त्यांनीच हे
बालनाट्य स्पर्धेचं रोपट लावलेलं आणि वाढवलेलं आहे असे प्रतिपादन सार्वजनिक वाचनालय बालभवन साने गुरुजी कथामालेच्यावतीने कै.रत्नाकर गुजराथी बालनाट्य स्पर्धेच्या उद्घघाटनप्रसंगी सावानाचे अध्यक्ष प्रा.दिलीप फडके यांनी केले. या
प्रसंगी व्यासपीठावर कार्याध्यक्ष गिरीश नातू, अर्थ सचिव
देवदत्त जोशी, नाट्यगृह सचिव सुरेश गायधनी, ग्रंथ
सचिव जयप्रकाश जातेगावकर इत्यादी मान्यवर
विराजमान होते. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मोहिनीदेवी
रुंगठा प्राथमिक विद्यामंदिर या शाळेचे गृहपाठला सुट्टी तर पुष्पावती रूंगठा हायस्कूलचे आणि.. शाळा सुरू झाली ही दोन बालनाटये सादर झाली. कोरोनानंतर
शाळा सुरू होतांना मुलांना गृहपाठ देण्याऐवजी
त्यांच्याकडून विविध उपक्रमांद्वारे अभ्यासाचा सराव
करून घेणे बाबत विषय गृहपाठाला सुट्टी या नाटकातून
मांडण्यात आला तर आणि.. शाळा सुरू झाली या
बालनाट्यातून कोरोना काळात बंद होणारी आणि कोरोना
नंतर सुरू होणारी शाळा यावर भाष्य करण्यात आले.
स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण 14 शालेय तसेच नाट्यसंस्थांनी
सहभाग नोंदवलेला आहे. परीक्षक म्हणून सुभाष पाटील,
श्रीराम वाघमारे, पल्लवी ओढेकर हे काम पाहत आहेत.
कार्यक्रमाला जयेश बर्वे, मंगेश मालपाठक, अजय
कापडणीस, सेवकवृंद – सुचित्रा मोरे, अपेक्षा देशपांडे,
योगिनी जोशी, दिलीप बोरसे, किरण पालवी, विद्या
डामसे तसेच शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
बालनाट्य स्पर्धेच्या उद्घाटनावेळी बालभवन प्रमुख,
प्रा.सोमनाथ मुठाळ यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
गीतांजली नाईक यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन
करण्यात आले.

आज सादर होणारी नाटक :
उद्या स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशी सकाळी 8.30 ते
दुपारी 4 वाजे दरम्यान तुला इंग्रजी येतं का?, पिढीजात,
आम्हाला पण शाळा पाहिजे, मिशन मास्तर, रिले आणि
बदला ही सहा बालनाट्य सादर होणार आहेत.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

1 hour ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

1 hour ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

1 hour ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

1 hour ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

1 hour ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

2 hours ago