module:1facing:0; ?hw-remosaic: 0; ?touch: (-1.0, -1.0); ?modeInfo: ; ?sceneMode: 32768; ?cct_value: 0; ?AI_Scene: (11, -1); ?aec_lux: 0.0; ?hist255: 0.0; ?hist252~255: 0.0; ?hist0~15: 0.0; ?module:1facing:0; hw-remosaic: 0; touch: (-1.0, -1.0); modeInfo: ; sceneMode: 32768; cct_value: 0; AI_Scene: (11, -1); aec_lux: 0.0; hist255: 0.0; hist252~255: 0.0; hist0~15: 0.0;
सिडको : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपूर्वी खुटवडनगर येथे मोकाट श्वानांच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच त्याच परिसरालगत असलेल्या शाहूनगरमध्ये पुन्हा मोकाट श्वानांनी नागरिकावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी (दि. 11) रात्री साडेदहाच्या सुमारास चार ते पाच मोकाट श्वानांच्या टोळक्याने केलेल्या हल्ल्यात संतोष कदम हे जखमी झाले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
कदम हे रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर शतपावलीसाठी घराबाहेर पडले होते. आयटीआय परिसरातून शाहूनगरच्या दिशेने जात असताना रस्त्यावर चार ते पाच मोकाट श्वानांचे टोळके त्यांना आडवे आले. काही वेळातच या श्वानांनी कदम यांच्या दिशेने धाव घेत त्यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे कदम यांनी प्रसंगावधान राखत श्वानांना दूर लोटण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रतिकारामुळे काही श्वान तेथून पळून गेले. मात्र, एका श्वानाने कदम यांना चावा घेतल्याने ते जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
खुटवडनगरमध्ये काही दिवसांपूर्वी मोकाट श्वानांच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये आधीच भीतीचे वातावरण आहे. त्यातच शाहूनगरमध्ये पुन्हा श्वानांच्या टोळक्याने नागरिकावर हल्ला केल्याने मोकाट श्वानांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रात्रीच्या वेळी पायी जाणार्या नागरिकांना मोकाट श्वानांच्या टोळक्यांपासून धोका निर्माण होत असून, महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वारंवार घटना घडूनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
Stray dogs attack a citizen in Shahunagar.
- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…
- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…
ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…
आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…
पंचवीस वर्षांपासून शेतकर्यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…