महाराष्ट्र

स्वराज संघटनेची स्थापना, छत्रपती संभाजी राजेंची घोषणा

स्वराज संघटनेची स्थापना, छत्रपती संभाजी राजेंची घोषणा
पुणे : मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. अपक्ष म्हणून काही दिवसांनी होणारी राज्यसभेची निवडणूक लढविणार असून, आपण स्वराज्य या नव्या संघटनेची स्थापना करीत असल्याची घोषणा छत्रपती संभाजी राजे यांनी आज पुण्यात केली. पत्रकार परिषदेत त्यांनी आगामी वाटचालीची दिशा स्पष्ट केली. स्वराज्य हे माझ्या नव्या संघटनेचे नाव असून या संघटनेचा प्रसार करण्यासाठी संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहे, असे संभाजीराजे म्हणाले. महाराष्ट्रातील जनतेने आतापर्यंत छत्रपती घराण्यावर नितांत प्रेम केले आहे. या प्रेमापोटी मी महाराष्ट्र पिंजून काढू शकलो. 2007 पासून आतापर्यंत मी गोंदिया वगळता संपूर्ण राज्याचा दौरा केला आहे. मागील 15-20 वर्षांत शेतकर्‍यांचे, कामगारांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेऊ शकलो. लोक छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांवर प्रेम का करतात, हे मला अनुभवास मिळाले. त्यातून काम करण्याची उर्जा मला मिळाली. त्यातून काम करण्यासाठी मला एक नवी ऊर्जा मिळाली. हे लक्षात आल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:हून बोलावून मला राष्ट्रपती नियुक्त खासदार होण्याची विनंती केली. राष्ट्रपती नियुक्त खासदाराची प्रतिष्ठा वेगळी असते. त्यामुळे मी 2016 मध्ये ते पद स्वीकारले. आगामी काळात या संघटनेचे रुपांतर पक्षात करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

1 hour ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

1 hour ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

2 hours ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

2 hours ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

2 hours ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

2 hours ago