दहावी , बारावी परीक्षेचा निकाल वेळेत लागणारमुंबई : दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीचे काम जवळपास पूर्ण झाले असून , आता दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल तयार करण्याचे काम सुरू आहे . १० जूनपर्यंत बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करणार असून , दहावीचा निकाल २० जूनपर्यंत जाहीर केला जाईल , अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे . शिक्षकांच्या पेपर तपासणी बहिष्कारामुळे निकाल उशिरा लागण्याची चिंता विद्यार्थी आणि पालकांना सतावत होती . परंतु , जून महिन्यातच दोन्ही परीक्षांचे निकाल लागणार असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे . शेवटच्या पेपरच्या ६० दिवसांनंतर निकाल जाहीर केला जातो ही प्रमाणित प्रक्रिया आहे . यावेळी बारावीचा पेपर १५ दिवस उशिरा सुरू झाला . त्यामुळे आम्ही १० जूनपर्यंत निकाल जाहीर करू , असे बोर्डाने म्हटले . त्यानंतर दहा दिवसांनी दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे .
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…