लासलगाव: समीर पठाण
लासलगाव शहरात रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास
अवकाळी पावसाने हजेरी लावली.रविवारचा आठवडे बाजार असल्यामुळे परिसरातील गावातून भाजीपाला विक्री करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांची व नागरिकांची काही काळासाठी धावपळ उडाली.या वेळी वीजप्रवाह देखील खंडित झाला. या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेला उन्हाळ कांदा,गहू,कांदा बियाणे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.अचानक आलेल्या पावसामुळे उघड्यावरील कांदे तसेच गहू झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली.अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उष्णतेपासून नागरिकांना थोड्या वेळ का होईना दिलासा मिळाला. हवामानातील बदलामुळे शेती पिकांना फटका बसत आहे.अशातच हवामान खात्याने पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकरी चिंतेत आहेत.सध्या कांदा गहू,हरभरा या पिकांची काढणी सुरु आहे.अशातच अवकाळी पाऊस आल्याने पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
सातपूर : प्रतिनिधी पीडित तरुणीला जिवे मारण्याची धमकी देऊन मॅक्स कॅफे तसेच आई-वडील घरी नसताना…
सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर येथील ऑरा बारमधील गोळीबार आणि खंडणी प्रकरणातील मुख्य संशयितांच्या अडचणी…
सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड गावातील एका शाळेजवळील कचराकुंडीत मृत अर्भक आढळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी…
सिडको : विशेष प्रतिनिधी येथील सुचितानगर परिसरातील बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सोने, चांदी, हिर्यांचे…
नाशिक: प्रतिनिधी सागाचे झाड तोडून त्याची विक्री करण्याची परवानगी देण्याच्या मोबदल्यात 11,500 रुपयांची लाच स्वीकारताना…
गुन्हेशोध पथकाची कामगिरी; 3 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त पंचवटी : प्रतिनिधी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर…