फाळके स्मारक पुढील आठवड्यापासून खुले होणार डागडुजीची कामे अंतिम टप्प्यात

 

नाशिक : प्रतिनिधी
नाशिककर आणि पर्यटकांचे नेहमीच लक्ष वेधून घेणारे फाळके स्मारक गत अडीच वर्षांपासून बंद आहे . कोरोना महामारीमुळे निर्बंध लागू झाल्याने हे उद्यान बंद करण्यात आले होते . त्यानंतर शासनाने निर्बंधांमध्ये संपुर्ण शिथिलता आणल्यानंतरही हे स्मारक बंद आहे . दरम्यान पुढील आठवडयापासून म्हणजे सोमवार ( दि . २० ) पासून हे स्मारक नाशिकरांसाठी खुले करण्यात येणार आहे . कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर नाशिक शहरातील विविध सभागृह , तसेच जिल्हयातील अभयारण्य यापूर्वीच खूली करण्यात आली . परंतु फाळके स्मारक अद्यापपर्यंत खुले करण्यात आलेलेच नसल्याने या स्मारकाला खुलण्यास मूहर्त कधी लागेल असा सवाल नाशिककरांकडून केला जात होता . पालिका आयुक्त रमेश पवार यांनी काही दिवसांपूर्वी या स्मारकाची पाहणी करत तेथे विविध कामे करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या होत्या . त्यानंतर पालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी वेळोवेळी स्मारकाची पाहणी केली . स्मारकात प्रवेशासाठी पूर्वीच्या दराप्रमाणेच तीकिटासाठी पैसे मोजावे लागणार आहे . उद्यान खुले करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून वारंवार सांगण्यात येत असले तरी उद्यान मात्र खुले झालेले नाही . त्यामुळे आता २० जूनला तरी उद्यान खुले होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . मागील अडीच वर्षांपासून महापालिकेचे फाळके उद्यान बंद आहे . पालिकेने आता ते खूले करण्याचा निर्णय घेतल्याने या पार्श्वभूमीवर येथील डागडुजीची कामे केली जात असून ती अंतिम टप्यात आहे . स्मारक खुले करण्यापूर्वी मनपा आयुक्त रमेश पवार हे स्वत : उद्यानाची पाहणी करणार आहे .

येथील पांडव लेणी आणि फाळके उद्यान नाशिककरांबरोबर पर्यटकांना आर्कषित करते . बाहेरून आलेले पर्यटक या ठिकाणाला आर्वजून भेट देतात . मात्र , अडीच वर्षांपासून हे उद्यान बंद असल्याने ते कधी सुरू होणार असा प्रश्न नाशिककरांकडून वारंवार विचारला जात आहे . त्यामुळे महापालिका प्रशासनाने येथील कारंजा व इतर छोटी – मोठी कामे पुर्ण करून पुढील आठवड्यापासून उद्यान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे .

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

16 minutes ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

24 minutes ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

30 minutes ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

35 minutes ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

41 minutes ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

56 minutes ago