नाशिक

कसारा ते मनमाड होणार तिसरी व चौथी रेल्वे लाइन

केंद्र मंत्रिमंडळाकडून मंजुरी

नाशिक : प्रतिनिधी
केंद्र मंत्रिमंडळाने कसारा-मनमाड रेल्वेमार्गावर तिसरी व चौथी लाइन टाकण्यास मंजुरी दिली आहे. 131 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी सुमारे 10,154 कोटींची तरतूद करण्यात आली असून, मुंबई-हावडा उच्च घनता रेल्वेमार्गाची वहनक्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
हा प्रकल्प कसारा ते मनमाडदरम्यान राबवण्यात येणार असून, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांना थेट लाभ होणार आहे. मार्गाच्या चौपदरीकरणामुळे प्रवासी गाड्यांची संख्या वाढेल. वेळेची बचत होईल तसेच मालवाहतुकीत सुमारे 46.1 एमटीपीए इतकी अतिरिक्त क्षमता उपलब्ध होईल.
या प्रकल्पामुळे धार्मिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांना उत्तम रेल्वे जोडणी मिळणार आहे. यात त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, भावली धरण आणि श्री घाटनदेवी माता मंदिर यांचा समावेश आहे.
आर्थिक व पर्यावरणीय दृष्टीनेही हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. सुधारित लॉजिस्टिक्समुळे दरवर्षी सुमारे 1,207 कोटींची बचत अपेक्षित असून, 54 कोटी किलो कार्बन उत्सर्जनात घट होणार आहे. ही घट साधारणपणे 2.2 कोटी झाडे लावल्याइतकी असल्याचे
मानले जाते.
एकूणच, कसारा-मनमाड चौपदरीकरण प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या उत्तर-दक्षिण रेल्वे दळणवळणाला नवी गती मिळणार असून, प्रवासी, उद्योग, व्यापार आणि पर्यावरण सर्वच घटकांना दीर्घकालीन लाभ होणार आहे.

The third and fourth railway lines will be built from Kasara to Manmad.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अधिक मासातील अधिक विचार

‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…

24 minutes ago

मरण स्वस्त आणि जगणं महाग

अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्‍यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…

43 minutes ago

खरंच!.. काय होते ते दिवस….

बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…

49 minutes ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात रिक्षाचालकांची मुजोरी

पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…

59 minutes ago

जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र

109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…

1 hour ago

अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका

1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…

1 hour ago