अंगणवाडी, आशा सेविकांचा अदृश्य संघर्ष
नाशिक : प्रतिनिधी
विविध क्षेत्रांतील कामगारांचा गौरव 1 मे रोजी कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. परंतु, या सगळ्यामध्ये एक वर्ग कायम दुर्लक्षित राहतो, तो म्हणजे अंगणवाडीसेविका आणि आशासेविका. समाजाच्या आरोग्य आणि पोषण व्यवस्थेचा कणा असलेल्या या महिला प्रत्यक्षात दिवसभर मेहनत करतात. पण त्यांना कामगार म्हणून मान्यता नाही. शहर आणि ग्रामीण भागात एकूण 3 हजार 803 आशा वर्कर्स आहेेत आणि 5 हजार 705 ग्रामीण आदिवासी व नागरी अंगणवाडीसेविका आहेत.
सकाळी दिवसाची सुरुवात लवकर करून गावोगावी फिरत गर्भवती महिलांची नोंद, लसीकरण मोहिमा, बालकांच्या आरोग्याची तपासणी, पोषण आहाराचे वितरण, विविध सर्वेक्षण अशा अनेक जबाबदार्या या सेविका पार पाडतात. शहर असो वा ग्रामीण भाग, आरोग्यव्यवस्थेचा पहिला संपर्क किंवा शेवटचा घटक म्हणून या आशा, अंगणवाडीसेविका काम करतात. कोविड काळात त्यांना फ्रंटलाइन वॉरियर म्हणून गौरविण्यात आले होते. परंतु, त्यानंतरही त्यांच्या कामाच्या आणि हक्कांच्या बाबतीत बदल झालेला नाही. शासनाकडून त्यांना स्वयंसेवक म्हणून संबोधले जाते. त्यामुळे त्यांना नियमित कर्मचार्याप्रमाणे पगार, सामाजिक सुरक्षा, निवृत्तिवेतन, आरोग्य विमा यांसारख्या सुविधा मिळत नाही. कामाच्या तासांच्या मर्यादा नाही; परंतु मानधन अत्यल्प आहे. अनेकवेळा अतिरिक्त कामासाठी कोणतेही वेतन मिळत नाही, अशी तक्रार या सेविकांकडून केली जाते. या सर्व गोष्टींतून एकच प्रश्न पडतो, ज्या महिला दिवसाचे अनेक तास समाजासाठी काम करतात. त्या कामगार नाही का? कामगार दिनाच्या दिवशी त्यांच्या श्रमाचा गौरव का होत नाही? त्यांच्या कामाला सेवा म्हणून गौरवताना त्यामागील श्रम आणि हक्कांकडे दुर्लक्ष होत नाही का? अंगणवाडी, आशा सेविकांच्या संघटनांकडून त्यांना कामगार म्हणून मान्यता, किमान वेतन लागू करण्याची, तसेच सामाजिक सुरक्षा योजना लागू करण्याची मागणी वारंवार केली जाते. त्यासाठी वारंवार आंदोलने केली जातात. परंतु, या मागण्यांवर अजूनही गंभीर विचार केलेला नाही, हीच शोकांतिका आहे.
They work but are not workers!
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…