नाशिक

येवल्यात बिबट्याचा धुमाकूळ; जळगाव नेऊरला तीन शेळ्या फस्त

येवला : प्रतिनिधी

येवला तालुक्यात सध्या बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि शाळकरी मुलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तालुक्यात बिबट्यांनी उच्छाद मांडला आहे. जळगाव नेऊर येथील प्रवीण शिंदे यांच्या वस्तीवर बिबट्याने शिरून तीन शेळ्या फस्त केल्या. यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

बिबट्यामुळे वाढलेली भीती

तालुक्यातील अनेक गावांमध्ये अनेकांना बिबट्याचे दर्शन झाले आहे. चार दिवसांपूर्वी पुरणगाव-शेवगे रस्त्यावर ऋषीकेश ठोंबरे या तरुणावर बिबट्या झडप घालण्याच्या तयारीत होता. त्याने आरडाओरड केल्यावर शेजारचे लोक धावले. त्यामुळे बिबट्याने पळ काढला. सध्या गावागावात बिबट्यांची दहशत पसरली आहे. स्थानिकांनी या भागात चार ते पाच बिबट्यांचा वावर असल्याची माहिती दिली आहे.

कोणत्या गावांमध्ये आहे बिबट्याचा वावर?

एरंडगाव, धुळगाव, जळगाव, पुरणगाव, शेवगे, सातारे आणि बदापूर या गावांच्या शिवारात बिबट्या वारंवार दिसत आहे. शेतकरी आणि नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण आहे. कुत्र्यांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे.

बिबट्याला लपायला जागा नाही

मका पीक उभे असताना बिबट्या या पिकात लपून राहायचा. आता मका पिकाची सोंगणी झाली आहे. त्यामुळे लपायला जागा नसल्याने बिबट्या मुक्तपणे फिरताना दिसत आहे.

शाळकरी मुलांची सुरक्षा

शाळकरी मुले बिबट्याच्या दहशतीखाली आहेत. मुलांना शाळेत पोहोचवण्यासाठी पालकांना त्रास सहन करावा लागत आहे. शेतकरीही रात्री घराबाहेर पडायला घाबरत आहेत.

बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करा

स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी वन विभागाकडे तातडीने बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. पिंजरे लावणे, रात्रीची गस्त वाढवणे आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना सुचवण्याची गरज आहे. लोकांनी रात्री घराबाहेर पडणे टाळले आहे. शेतात जाताना लोक गटागटाने जात आहेत. वन विभागाने त्वरित पाऊले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

अधिक मासातील अधिक विचार

‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…

23 minutes ago

मरण स्वस्त आणि जगणं महाग

अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्‍यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…

42 minutes ago

खरंच!.. काय होते ते दिवस….

बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…

49 minutes ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात रिक्षाचालकांची मुजोरी

पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…

58 minutes ago

जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र

109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…

1 hour ago

अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका

1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…

1 hour ago